शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:12 IST

लहान मुलांनी भिंतीवर काढलेली चित्रे समजून घेण्यासाठी पालकांनी अद्ययावत राहिले पाहिजे. बालसाहित्य संमेलनाचे ज्ञानाचा खजिना विद्यार्थ्यांना मिळत असतो, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बाल साहित्यिक राजीव तांबे यांनी करून शंभर वर्षाच्या परंपरा असलेल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने दरवर्षी राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलन भरवावे, असे आवाहनही केले.

नाशिकरोड : लहान मुलांनी भिंतीवर काढलेली चित्रे समजून घेण्यासाठी पालकांनी अद्ययावत राहिले पाहिजे. बालसाहित्य संमेलनाचे ज्ञानाचा खजिना विद्यार्थ्यांना मिळत असतो, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बाल साहित्यिक राजीव तांबे यांनी करून शंभर वर्षाच्या परंपरा असलेल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने दरवर्षी राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलन भरवावे, असे आवाहनही केले.नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे, खजिनदार वैशाली गोसावी, संमेलन प्रमुख शोभना भिडे, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, कार्यक्रमप्रमुख अपर्णा क्षेमकल्याणी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करण्यात आले. यावेळी तांबे यांनी लिहिलेल्या पुस्तकातील कविता व कथांची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना जे सोपे वाटते ते आधी सोडवावे आणि जे कठीण असते त्यासाठी प्रयत्न करावेत. कोणतीही कथा किंवा कविता ही बोध उपदेशासाठी लिहिली नसून त्यातून विद्यार्थ्यांचा आनंद मिळवायचा असे तांबे यांनी नमूद करून विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. सुनील कुटे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी लिहिण्यासाठी वाचले पाहिजे, मन:शांती ठेवली पाहिजे व अंतकरणापासून लिहिण्याच्या वाटा शोधल्या पाहिजेत. या राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलनातून विद्यार्थ्यांना लेखन, काव्य, कथा लिहिण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलन आयोजनासाठी संस्था निश्चितच प्रयत्नशील राहील असे सांगितले. दोन दिवसीय संमेलनाचा आढावा शोभना भिडे यांनी सादर केला. कार्यक्रमात कीर्ती यावलकर, युगंधा खोबरेकर, श्रीकृष्ण काळे, लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. संमेलनानिमित्त आयोजित कविता लेखन, निबंध स्पर्धा यासह विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तिसºया सत्रात ‘प्रवास ज्ञानपीठाचा’ या कार्यक्रमात ज्ञानपीठ विजेत्या मराठी साहित्यिकांच्या साहित्य कृतीवर आधारित रंगमंच अविष्कार सादर करण्यात आले. सूत्रसंचलन रूपाली झोडगेकर यांनी केले. परिचय प्रसाद कुलकर्णी यांनी तर आभार वैशाली गोसावी यांनी मानले. यावेळी जयंत मोंढे, मधुकर जगपात, संजय पराजंपे, अलका कुलकर्णी, प्राचार्य प्र. ला. ठोके, संजीवनी धामणे, समीर लिंबारे आदी उपस्थित होते.