शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

लोकसहभाग वाढविणाऱ्या क्षेत्र समित्यांना राज्य शासनाचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST

संजय पाठक, नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोकांच्या अधिकाराचा गजर होत असला तरी प्रत्यक्षात मात्र लोकसहभागासाठी असलेल्या तरतुदी ...

संजय पाठक,

नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोकांच्या अधिकाराचा गजर होत असला तरी प्रत्यक्षात मात्र लोकसहभागासाठी असलेल्या तरतुदी विविध राज्यांकडून धाब्यावर बसवल्या जात आहेत. केंद्र शासनाने शहरांसाठी जवाहरलाल नेहरू अभियान राबवतानाा राज्यांना शहरी भागात वॉर्ड (क्षेत्र) समित्या तयार करून त्यांना व्यापक अधिकार देण्याची सक्ती केली होती. मात्र, अभियान संपून जवळपास अनेक वर्षे झाली तरी अजूनही अशा प्रकारे वॉर्ड समित्यांसाठी नियमावली करण्यात आलेली नाही, त्यामुुळे शहरी भागात लोकसहभाग कसा वाढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे वेगवेगळी आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यादृष्टीने शहराचे नियेाजन करण्यात येत असले तरी ते स्थानिक गरजेनुसार असले पाहिजे आणि त्यानुसार शहराचे धोरण ठरले पाहिजे, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने ही तरतूद करण्यात आली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने शहरांना पायाभूत सुविधा देताना बळकटीकरणासाठी जवाहरलाल नेहरू नागरी अभियान राबिवले. त्यात केंद्र आणि राज्य शासनाकडून ७० टक्के निधी विविध प्रकल्पांसाठी देण्यात आला. त्यावेळी अभियानात सहभागी शहरांसाठी राज्य शासन आणि संबंधीत महापालिकांनी काय धोरण आखावे, यासाठी एक त्रिपक्षीय करार त्यावेळी करण्यात आला. त्यात रिफॉमर्स अंतर्गत अनेक तरतुदी करण्यात आल्या होत्या आणि अभियानात सहभागी झाल्याने राज्य शासनालादेखील त्या करणे आवश्यक होते. त्यात वॉर्ड (क्षेत्र) समित्यांचा समावेश होता.

वॉर्डांमध्ये काय हवे, काय नको, हे स्थानिक पातळीवर ठरले पाहिजे. त्यासाठी नगरसेवक, प्रतिष्ठीत नागरिक, निवृत्त अधिकारी, महिला प्रतिनिधी असा त्यात समावेश असेल. ही समिती सर्व प्रकारचे नियोजन करून प्रस्तावित कामेदेखील निर्धारित करेल. त्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करून ते महापालिकेला पाठवेल. नव्या सुधारणांनुसार महापालिकेच्या एकूण अंदाजपत्रकापैकी सुमारे ६० टक्के अंदाजपत्रक अशा प्रकारे क्षेत्र विकास समितीकडून येईल आणि चाळीस टक्के भांडवली कामांचे अंदाज पत्रक संपूर्ण शहराचा विचार करून तयार करण्यात येईल, अशी तरतूद होती. राज्य सरकारने अशा प्रकारच्या समित्या तयार करण्यासाठी कायदा करून नंतर मात्र नियमावली तयार करण्याचे कामच पुढे केले नाही. त्यामुळे एक चांगली सुधारणादेखील कागदावर पडून आहे.

...इन्फो...

केंद्र आणि राज्य शासन तसेच महापालिका यांच्यातील करारानुसार राज्य सरकारने काही सुधारणा केल्या. त्यात कमाल नागरी जमीन धारणा कायदा रद्द करण्याचे एक रिफार्म होते, त्यासंदर्भात कार्यवाही झाली असली तरी त्यातील काही कलमे तशीच आहेत. मात्र, अशा प्रकारे लोकांना अधिकार देण्यासंदर्भातील चांगल्या रिफॉर्म्सवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.