शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभाग वाढविणाऱ्या क्षेत्र समित्यांना राज्य शासनाचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST

संजय पाठक, नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोकांच्या अधिकाराचा गजर होत असला तरी प्रत्यक्षात मात्र लोकसहभागासाठी असलेल्या तरतुदी ...

संजय पाठक,

नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोकांच्या अधिकाराचा गजर होत असला तरी प्रत्यक्षात मात्र लोकसहभागासाठी असलेल्या तरतुदी विविध राज्यांकडून धाब्यावर बसवल्या जात आहेत. केंद्र शासनाने शहरांसाठी जवाहरलाल नेहरू अभियान राबवतानाा राज्यांना शहरी भागात वॉर्ड (क्षेत्र) समित्या तयार करून त्यांना व्यापक अधिकार देण्याची सक्ती केली होती. मात्र, अभियान संपून जवळपास अनेक वर्षे झाली तरी अजूनही अशा प्रकारे वॉर्ड समित्यांसाठी नियमावली करण्यात आलेली नाही, त्यामुुळे शहरी भागात लोकसहभाग कसा वाढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे वेगवेगळी आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यादृष्टीने शहराचे नियेाजन करण्यात येत असले तरी ते स्थानिक गरजेनुसार असले पाहिजे आणि त्यानुसार शहराचे धोरण ठरले पाहिजे, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने ही तरतूद करण्यात आली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने शहरांना पायाभूत सुविधा देताना बळकटीकरणासाठी जवाहरलाल नेहरू नागरी अभियान राबिवले. त्यात केंद्र आणि राज्य शासनाकडून ७० टक्के निधी विविध प्रकल्पांसाठी देण्यात आला. त्यावेळी अभियानात सहभागी शहरांसाठी राज्य शासन आणि संबंधीत महापालिकांनी काय धोरण आखावे, यासाठी एक त्रिपक्षीय करार त्यावेळी करण्यात आला. त्यात रिफॉमर्स अंतर्गत अनेक तरतुदी करण्यात आल्या होत्या आणि अभियानात सहभागी झाल्याने राज्य शासनालादेखील त्या करणे आवश्यक होते. त्यात वॉर्ड (क्षेत्र) समित्यांचा समावेश होता.

वॉर्डांमध्ये काय हवे, काय नको, हे स्थानिक पातळीवर ठरले पाहिजे. त्यासाठी नगरसेवक, प्रतिष्ठीत नागरिक, निवृत्त अधिकारी, महिला प्रतिनिधी असा त्यात समावेश असेल. ही समिती सर्व प्रकारचे नियोजन करून प्रस्तावित कामेदेखील निर्धारित करेल. त्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करून ते महापालिकेला पाठवेल. नव्या सुधारणांनुसार महापालिकेच्या एकूण अंदाजपत्रकापैकी सुमारे ६० टक्के अंदाजपत्रक अशा प्रकारे क्षेत्र विकास समितीकडून येईल आणि चाळीस टक्के भांडवली कामांचे अंदाज पत्रक संपूर्ण शहराचा विचार करून तयार करण्यात येईल, अशी तरतूद होती. राज्य सरकारने अशा प्रकारच्या समित्या तयार करण्यासाठी कायदा करून नंतर मात्र नियमावली तयार करण्याचे कामच पुढे केले नाही. त्यामुळे एक चांगली सुधारणादेखील कागदावर पडून आहे.

...इन्फो...

केंद्र आणि राज्य शासन तसेच महापालिका यांच्यातील करारानुसार राज्य सरकारने काही सुधारणा केल्या. त्यात कमाल नागरी जमीन धारणा कायदा रद्द करण्याचे एक रिफार्म होते, त्यासंदर्भात कार्यवाही झाली असली तरी त्यातील काही कलमे तशीच आहेत. मात्र, अशा प्रकारे लोकांना अधिकार देण्यासंदर्भातील चांगल्या रिफॉर्म्सवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.