शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

टोमॅटो उत्पादकासाठी केंद्राची बाजार हस्तक्षेप योजना राज्य शासनाला करावी लागेल खरेदी : मगच केंद्र उचलणार आर्थिक वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 01:56 IST

नाशिक : टोमॅटोची वाढलेली आवक व कोसळलेल्या दरामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिकसह राज्यातील विविध भागांतील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून टोमॅटो रस्त्यावर फेकण्याचे प्रकार घडू लागले असून, त्यातून शेतकऱ्यांचे आंदोलन उभे राहू पाहात असताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री व वाणिज्यमंत्र्यांशी संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली असता, केंद्र सरकारने यासंदर्भात बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत राज्य सरकारने मागणी केल्यास या योजनेचा लाभ घेता येऊ शकणार असून, त्यासाठी राज्य सरकारला टोमॅटो खरेदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

नाशिक : टोमॅटोची वाढलेली आवक व कोसळलेल्या दरामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिकसह राज्यातील विविध भागांतील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून टोमॅटो रस्त्यावर फेकण्याचे प्रकार घडू लागले असून, त्यातून शेतकऱ्यांचे आंदोलन उभे राहू पाहात असताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री व वाणिज्यमंत्र्यांशी संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली असता, केंद्र सरकारने यासंदर्भात बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत राज्य सरकारने मागणी केल्यास या योजनेचा लाभ घेता येऊ शकणार असून, त्यासाठी राज्य सरकारला टोमॅटो खरेदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने टोमॅटो व बटाटा या नाशवंत फळभाज्यांसाठी केंद्र सरकारच्या बाजार हस्तक्षेप योजनेचा हवाला दिला आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार ५० टक्के तर केंद्र सरकार ५० टक्के आर्थिक भार उचलू शकते, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी टोमॅटो व बटाट्याचे गेल्या वर्षाच्या उत्पन्नापेक्षा यंदा १० टक्के उत्पादनात वाढ झाली पाहिजे व किमतीत १० टक्के घट व्हायला हवी, अशी अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात टोमॅटोचे वाढलेले उत्पादन व कोसळलेल्या किमती पाहता केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याशी संपर्क साधून नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादकांना रस्त्यावर टोमॅटो फेकण्याची वेळ आल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी या प्रश्नी लवकरच तोडगा काढण्याचे मान्य केले. राज्य सरकारने केंद्राला विनंती केल्यास बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत राज्य सरकारला ३ रुपये किलो या दराने टोमॅटोची खरेदी करावी लागेल व त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा केंद्र व राज्य सरकारने निम्मा भार उचलावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक