शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

टोमॅटो उत्पादकासाठी केंद्राची बाजार हस्तक्षेप योजना राज्य शासनाला करावी लागेल खरेदी : मगच केंद्र उचलणार आर्थिक वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 01:56 IST

नाशिक : टोमॅटोची वाढलेली आवक व कोसळलेल्या दरामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिकसह राज्यातील विविध भागांतील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून टोमॅटो रस्त्यावर फेकण्याचे प्रकार घडू लागले असून, त्यातून शेतकऱ्यांचे आंदोलन उभे राहू पाहात असताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री व वाणिज्यमंत्र्यांशी संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली असता, केंद्र सरकारने यासंदर्भात बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत राज्य सरकारने मागणी केल्यास या योजनेचा लाभ घेता येऊ शकणार असून, त्यासाठी राज्य सरकारला टोमॅटो खरेदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

नाशिक : टोमॅटोची वाढलेली आवक व कोसळलेल्या दरामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिकसह राज्यातील विविध भागांतील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून टोमॅटो रस्त्यावर फेकण्याचे प्रकार घडू लागले असून, त्यातून शेतकऱ्यांचे आंदोलन उभे राहू पाहात असताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री व वाणिज्यमंत्र्यांशी संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली असता, केंद्र सरकारने यासंदर्भात बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत राज्य सरकारने मागणी केल्यास या योजनेचा लाभ घेता येऊ शकणार असून, त्यासाठी राज्य सरकारला टोमॅटो खरेदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने टोमॅटो व बटाटा या नाशवंत फळभाज्यांसाठी केंद्र सरकारच्या बाजार हस्तक्षेप योजनेचा हवाला दिला आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार ५० टक्के तर केंद्र सरकार ५० टक्के आर्थिक भार उचलू शकते, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी टोमॅटो व बटाट्याचे गेल्या वर्षाच्या उत्पन्नापेक्षा यंदा १० टक्के उत्पादनात वाढ झाली पाहिजे व किमतीत १० टक्के घट व्हायला हवी, अशी अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात टोमॅटोचे वाढलेले उत्पादन व कोसळलेल्या किमती पाहता केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याशी संपर्क साधून नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादकांना रस्त्यावर टोमॅटो फेकण्याची वेळ आल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी या प्रश्नी लवकरच तोडगा काढण्याचे मान्य केले. राज्य सरकारने केंद्राला विनंती केल्यास बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत राज्य सरकारला ३ रुपये किलो या दराने टोमॅटोची खरेदी करावी लागेल व त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा केंद्र व राज्य सरकारने निम्मा भार उचलावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक