शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नदी संवर्धन धोरण पुनरुज्जीवित करण्यास राज्य शासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST

राज्यातील नद्यांचा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी ऐरणीवर आणला आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक, मुंबई अशा सर्वच ठिकाणी नदी प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणप्रेमी ...

राज्यातील नद्यांचा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी ऐरणीवर आणला आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक, मुंबई अशा सर्वच ठिकाणी नदी प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणप्रेमी आपापल्या स्तरावर लढा देत आहेत. नदीकाठी अनेक प्रदूषणकारी उद्योग आहेत, त्यासंदर्भात यापूर्वी शासनाने धाेरण ठरवले होते, त्याचाही आधार घेतला जात आहे. या धोरणांतर्गत नदीच्या उगमापासून पहिले धरणल नंतर पहिल्या धरणापासून दुसरे धरण हे दुसरे क्षेत्र असे विभाग पाडून नदीपात्रापासून पाचशे मीटर अथवा एक किलोमीटर अंतरात कोणते उद्योग सुरू करता येतील, याचे निकष ठरवून देण्यात आले होते. मात्र, नंतर ते रद्द करण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १६ फेब्रुवारी २०१५ रोजी यासंदर्भात परिपत्रक काढले होते. नद्यांच्या खोऱ्यांमध्ये उद्योगांचे स्थान नियमन करण्यासाठी व नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी १३ जुलै २००९ व १५ जुलै २००० रोजी निश्चित करण्यात आलेले धोरण रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यासंदर्भात दाखल प्रकरणे देखील निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर सुधारित धोरण पुन्हा तयार करण्यात आल्याने सध्या नदीकाठच्या उद्योगांना कोणतेही नियमच लागू नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, नाशिकच्या गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसंदर्भात २०१२ मध्ये जनहित याचिका राजेश पंडित, निशिकांत पगारे आणि जसबीरसिंग यांनी दाखल केली. १७६/२०१२ या जनहित याचिकेच्या दरम्यान या धोरणाचा उल्लेख झाल्यानंतर अशाप्रकारचे कोणते धोरणच अस्तित्वात नसल्याचे देखील न्यायालयासमोर आले. त्यामुळे २०१८ मध्ये न्यायमूर्ती ए. एस. ओक आणि ए. के. मेमन यांनी दिलेल्या निकालपत्रात चार आठवड्यांत अशाप्रकारचे धाेरण निश्चित करण्याचे आदेश दिले. परंतु, अद्यापही त्यांची अंमलबजावणी झालेली नाही.

कोट...

नदीकाठी कोणते उद्योग किती अंतरावर असावे यासाठी आरआरझेड पॉलिसी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे मात्र उच्च न्यायालयाने आदेश देऊनही राज्य शासन त्यावर गंभीर नाही. गेल्यावर्षी प्रदूषण नियंत्रण मंडळाला यासंदर्भात स्मरणपत्र दिले आहे. परंतु, उपयोग झालेला नाही. आता कोरोना निर्बंध शिथिल झाल्यावर उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येणार आहे.

राजेश पंडित, याचिकाकर्ता