शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

राज्य सरकार मोठे की परमवीर सिंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:11 IST

नाशिक : पोलीस ठाण्यात येणारी कोणतीही तक्रार असो त्याची दखल घेतली जावी असा दंडक आहे. म्हणूनच अधूनमधून वरिष्ठ पोलीस ...

नाशिक : पोलीस ठाण्यात येणारी कोणतीही तक्रार असो त्याची दखल घेतली जावी असा दंडक आहे. म्हणूनच अधूनमधून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वेशांतर करून पोलीस ठाण्यांना भेटी देऊन त्याची खातरजमा केली आहे; परंतु कोणती तक्रार घ्यायची वा नाही हे प्रभारींच्या मानसिकतेवर अवलंबून असते. याचे प्रत्यंतर पोलीस उपअधीक्षक निपुंगे यांनी मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांविरुद्ध केलेल्या व नाकारल्या गेलेल्या तक्रारीवरून स्पष्ट झाले आहे.

पोलीस मॅन्युअलमध्येच कोणतीही तक्रार नाकारण्याचा जसा पोलिसांना अधिकार नाही, तसाच प्रत्येक तक्रारीची शहानिशा करण्याचा अधिकारही बहाल केलेला आहे. पोलिसांना अमर्याद अधिकार प्रदान करणाऱ्या मुंबई पोलीस अ‍ॅक्टमध्ये अशीच तरतूद अधोरेखित केलेली असेल तर आडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवर पुढील कारवाई करण्यासाठी हात का आखडले, यावर पोलीस खात्यात व कायद्याच्या जाणकारांमध्ये चर्चा होत आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील उपअधीक्षक श्यामराव निपुंगे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन परमवीर सिंग यांनी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपला केलेला छळ व महिलेच्या आत्महत्येत गोवण्याच्या केलेल्या प्रयत्नांबद्दल संबंधितांवर कारवाई करण्याची व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आडगाव पोलिसांनी तक्रार ठेवून घेतली. मात्र, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या तक्रारीची दखल घेण्यात येणार नसल्याचे व हा प्रकार भिवंडी हद्दीत घडल्याचे सांगून त्यावर पुढील कार्यवाही करण्यास नकार दिला. हद्दीच्या वादामुळे आपली तक्रार स्वीकारली जाणार नाही किंवा तक्रारच कायदेशीर बाबीत बसत नसेल तर निपुंगे यांनी तक्रारच का करावी? हा जसा प्रश्न आहे, तसाच प्रश्न पोलीस मॅन्युअलनुसार घेतलेल्या तक्रारीची शहानिशा करून ती शून्य क्रमांकाने दाखल करून घेणे व ज्या हद्दीत गुन्हा घडला असेल त्या संबंधित पोलीस ठाण्यात पाठवून देण्याच्या अधिकाराचा वापर करण्यास पोलीस आयुक्तालयाने संकोच का केला, याचे उत्तरही मिळालेले नाही.

मध्यंतरी मोटार परिवहन विभागातील बदल्यांच्या भ्रष्टाचाराबाबत पंचवटी पोलीस ठाण्यातील तक्रारीची पोलीस आयुक्तालयाने तत्काळ दखल घेऊन चौकशीची चक्रे फिरविली. तीन आठवडे तपास करूनही या प्रकरणात तथ्य नसल्याचे व तसेच तक्रारदाराने केलेली तक्रारीची चौकशी आपल्या कक्षेत नसल्याचे पोलीस आयुक्तांनी जाहीर केले होते. उप अधीक्षक श्यामराव निपुंगे यांनी दिलेल्या तक्रारीचे स्वरूपदेखील याच मुद्यात मोडणारे असताना त्याबाबत घेतली जाणारी भूमिका मात्र संशयास्पद वाटते. जर आरटीओ प्रकरणात पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले असतील व म्हणून त्या प्रकरणाची चौकशी नाशिक पोलीस करीत असतील, तर निपुंगे प्रकरणातही विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पोलीस आयुक्तालयाला पत्र पाठवून तक्रारीची शहानिशा करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही पोलीस आयुक्तालय निपुंगे प्रकरणात चालढकल करीत असतील, तर परमवीर सिंग यांचा राज्याच्या पोलीस दलात अजूनही दबदबा आहे असेच मानावे लागेल.