शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार मोठे की परमवीर सिंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:11 IST

नाशिक : पोलीस ठाण्यात येणारी कोणतीही तक्रार असो त्याची दखल घेतली जावी असा दंडक आहे. म्हणूनच अधूनमधून वरिष्ठ पोलीस ...

नाशिक : पोलीस ठाण्यात येणारी कोणतीही तक्रार असो त्याची दखल घेतली जावी असा दंडक आहे. म्हणूनच अधूनमधून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वेशांतर करून पोलीस ठाण्यांना भेटी देऊन त्याची खातरजमा केली आहे; परंतु कोणती तक्रार घ्यायची वा नाही हे प्रभारींच्या मानसिकतेवर अवलंबून असते. याचे प्रत्यंतर पोलीस उपअधीक्षक निपुंगे यांनी मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांविरुद्ध केलेल्या व नाकारल्या गेलेल्या तक्रारीवरून स्पष्ट झाले आहे.

पोलीस मॅन्युअलमध्येच कोणतीही तक्रार नाकारण्याचा जसा पोलिसांना अधिकार नाही, तसाच प्रत्येक तक्रारीची शहानिशा करण्याचा अधिकारही बहाल केलेला आहे. पोलिसांना अमर्याद अधिकार प्रदान करणाऱ्या मुंबई पोलीस अ‍ॅक्टमध्ये अशीच तरतूद अधोरेखित केलेली असेल तर आडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवर पुढील कारवाई करण्यासाठी हात का आखडले, यावर पोलीस खात्यात व कायद्याच्या जाणकारांमध्ये चर्चा होत आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील उपअधीक्षक श्यामराव निपुंगे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन परमवीर सिंग यांनी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपला केलेला छळ व महिलेच्या आत्महत्येत गोवण्याच्या केलेल्या प्रयत्नांबद्दल संबंधितांवर कारवाई करण्याची व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आडगाव पोलिसांनी तक्रार ठेवून घेतली. मात्र, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या तक्रारीची दखल घेण्यात येणार नसल्याचे व हा प्रकार भिवंडी हद्दीत घडल्याचे सांगून त्यावर पुढील कार्यवाही करण्यास नकार दिला. हद्दीच्या वादामुळे आपली तक्रार स्वीकारली जाणार नाही किंवा तक्रारच कायदेशीर बाबीत बसत नसेल तर निपुंगे यांनी तक्रारच का करावी? हा जसा प्रश्न आहे, तसाच प्रश्न पोलीस मॅन्युअलनुसार घेतलेल्या तक्रारीची शहानिशा करून ती शून्य क्रमांकाने दाखल करून घेणे व ज्या हद्दीत गुन्हा घडला असेल त्या संबंधित पोलीस ठाण्यात पाठवून देण्याच्या अधिकाराचा वापर करण्यास पोलीस आयुक्तालयाने संकोच का केला, याचे उत्तरही मिळालेले नाही.

मध्यंतरी मोटार परिवहन विभागातील बदल्यांच्या भ्रष्टाचाराबाबत पंचवटी पोलीस ठाण्यातील तक्रारीची पोलीस आयुक्तालयाने तत्काळ दखल घेऊन चौकशीची चक्रे फिरविली. तीन आठवडे तपास करूनही या प्रकरणात तथ्य नसल्याचे व तसेच तक्रारदाराने केलेली तक्रारीची चौकशी आपल्या कक्षेत नसल्याचे पोलीस आयुक्तांनी जाहीर केले होते. उप अधीक्षक श्यामराव निपुंगे यांनी दिलेल्या तक्रारीचे स्वरूपदेखील याच मुद्यात मोडणारे असताना त्याबाबत घेतली जाणारी भूमिका मात्र संशयास्पद वाटते. जर आरटीओ प्रकरणात पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले असतील व म्हणून त्या प्रकरणाची चौकशी नाशिक पोलीस करीत असतील, तर निपुंगे प्रकरणातही विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पोलीस आयुक्तालयाला पत्र पाठवून तक्रारीची शहानिशा करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही पोलीस आयुक्तालय निपुंगे प्रकरणात चालढकल करीत असतील, तर परमवीर सिंग यांचा राज्याच्या पोलीस दलात अजूनही दबदबा आहे असेच मानावे लागेल.