शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

आजपासून कांदा लिलाव होणार सुरू

By admin | Updated: July 25, 2016 23:06 IST

गोणी मार्केटची मागणी : शेतकऱ्यांची नाराजी

नाशिक : कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारी (दि.२५) लासलगावसह जिल्ह्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा-बटाटा विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र व्यापाऱ्यांनी अहमदनगर-राहुरीच्या धर्तीवर गोणीत भरून आणलेल्या कांदा व बटाट्याचा लिलाव करण्याची अट टाकल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आधीपासूनच कांदा व बटाट्याची गोणी भरून खरेदी-विक्रीचे लिलाव होत आहेत. मात्र लासलगाव, पिंपळगाव या कांदा खरेदी- विक्रीच्या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याची भूमिका घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अडचण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर लासलगाव व पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी नवीन परवाने देण्याबाबत जाहिरात दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी नमते घेतल्याची चर्चा होती. सोमवारपासून कांदा व बटाटे व्यापाऱ्यांनी परवाने परत घेण्यास सुरुवात केल्याने मंगळवारपासून कांदा व बटाटा विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या व्यापाऱ्यांनी अहमदनगर व राहुरीप्रमाणे गोणीमार्केट सुरू करण्याची अट टाकली आहे. त्यानुसार बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना गोणीत भरून माल आणण्याचे आवाहन केले आहे. मात्र गोणी आणि गोणीत भरण्याची हमाली असा सरासरी क्विंटलमागे ७० ते ८० रुपयांचा खर्च शेतकऱ्यांच्या माथी येणार असल्याने शेतकऱ्यांनी या गोणीमार्केटला विरोध केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून होणाऱ्या कांदा-बटाटे विक्री व्यवहाराकडे सहकार विभागाचे लक्ष राहणार आहे. (प्रतिनिधी)