शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

गंगापूर धरणातून विसर्ग सुरू

By admin | Updated: July 17, 2017 00:26 IST

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यांमधील धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यांमधील धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, गंगापूर धरण ७६ टक्के भरले आहे. धरणातून सुमारे दोन हजार ७८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला पूरसदृश परिस्थिती कायम आहे. रविवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी जिल्ह्यात सुमारे ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  गेल्या शुक्रवारपासून नाशिक जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. रविवारी मात्र नाशिककरांना दिलासा मिळाला. पावसाने काहीप्रमाणात उघडीप दिल्याने नाशिककर घराबाहेर पडले.  सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात सुमारे तीन मि.मी. पावसाची नोंद झाली, तर चोवीस तासांत १६ मि.मी. पाऊस झाला. धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा २ हजार ७८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला, तर दारणा धरणातून १० हजार ७७०, नांदूरमधमेश्वरमधून २७ हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून पूरसदृश परिस्थिती कायम आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झला असून, रिमझिम सरी मात्र सुरूच आहे. सतर्कतेचा इशारा कायमगेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये मोठी वाढ झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सकाळपासून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीला दुपारनंतर पाण्याची पातळी वाढली. जिल्हा प्रशासनाने तातडीने परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना केल्या. तसेच आपत्ती निवारण कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी नदीकाठचा धोका कायम आहे.