शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
3
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
4
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
5
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
6
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
8
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
9
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
10
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
11
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
12
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
13
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
14
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
15
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
16
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
17
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
18
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
19
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
20
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!

गंगापूर धरणातून विसर्ग सुरू

By admin | Updated: July 17, 2017 00:26 IST

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यांमधील धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यांमधील धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, गंगापूर धरण ७६ टक्के भरले आहे. धरणातून सुमारे दोन हजार ७८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला पूरसदृश परिस्थिती कायम आहे. रविवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी जिल्ह्यात सुमारे ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  गेल्या शुक्रवारपासून नाशिक जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. रविवारी मात्र नाशिककरांना दिलासा मिळाला. पावसाने काहीप्रमाणात उघडीप दिल्याने नाशिककर घराबाहेर पडले.  सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात सुमारे तीन मि.मी. पावसाची नोंद झाली, तर चोवीस तासांत १६ मि.मी. पाऊस झाला. धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा २ हजार ७८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला, तर दारणा धरणातून १० हजार ७७०, नांदूरमधमेश्वरमधून २७ हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून पूरसदृश परिस्थिती कायम आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झला असून, रिमझिम सरी मात्र सुरूच आहे. सतर्कतेचा इशारा कायमगेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये मोठी वाढ झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सकाळपासून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीला दुपारनंतर पाण्याची पातळी वाढली. जिल्हा प्रशासनाने तातडीने परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना केल्या. तसेच आपत्ती निवारण कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी नदीकाठचा धोका कायम आहे.