शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

नाशिक शहरात कडक निर्बंधांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:15 IST

नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने बारा दिवसांसाठी कडक निर्बंध लागू केले असून, बुधवारी (दि.१२) ...

नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने बारा दिवसांसाठी कडक निर्बंध लागू केले असून, बुधवारी (दि.१२) दुपारी बारा वाजेपासून त्याच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला. त्यापूर्वी सकाळी पुन्हा बाजारपेठेेत अलोट गर्दी झाली हेाती. दुपारनंतर गर्दी कमी झाली असली, तरी पहिलाच दिवस असल्याने, नागरिकांशी पोलिसांनीही सौजन्य दाखविले आणि फारशी अडवणूक केली नाही. मात्र, दुपारनंतर बाजार समित्या, किराणा सारे काही बंद होते. नाशिक जिल्ह्यात बुधवारपासून (दि.१२) कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. मात्र, सोमवारी हा निर्णय जाहीर केल्यानंतर नागरिकांना अवघा एक दिवस खरेदीसाठी मिळाला.

दरम्यान, बहुतांशी उद्याेग बंद ठेवावे लागल्याने उद्योग चक्र थांबले आहे. दुसरीकडे भाजीबाजारही सायंकाळनंतर ठप्प झाले, तर हॉटेलच्या पार्सल सेेवेवरही परिणाम झाला.

जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्यानुसार, बुधवारी (दि.१२) बारा वाजेनंतर कडक निर्बंध लागू होणार असल्याने शहरातील प्रमुख बाजारात विशेषत: रविवार कारंजा, पचंवटी कारंजा, जुने नाशिक, धान्य बाजार या सर्व भागांसह उपनगरात प्रचंड गर्दी सलग दुसऱ्या दिवशी उलटली होती. कडक निर्बंधाची घोषणा असल्याने पेालिसांनीही या गर्दीला रोखले नाही. मात्र, दुसऱ्या दिवशीही वावर कायम होता आणि निर्बंध लागू झाल्यानंतरही पोलिसांनी केवळ अनेक भागात मोटारीने फिरून निर्बंध लागू झाल्याने दुकाने बंद करण्यास सांगितले. मात्र, दंडुक्याचा वापर केला नाही की, अडवणूक केली नाही.

इन्फो...

उद्योग बंदच

जिल्ह्यातील उद्योगांमध्ये जर निवास व्यवस्था असेल, तरच सुरू ठेवण्याचे आदेश सोमवारी (दि.१०) जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. मात्र, त्यात बदल केला आणि दाेन किलो मीटरच्या आत निवास आणि व्यवस्था असेल, तरीही उद्योग सुरू ठेवता येतील, असे सुधारित आदेश मंगळवारी (दि.११) रात्री दिले, परंतु प्रत्यक्षात इतक्या कमी वेळात अशी व्यवस्था करणे शक्य नसल्याने उद्योग बंद होते.

इन्फो..

दुपारनंतर बाजार समिती बंद

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी भाजीपाला, फळभाज्यांची आवक जेमतेम राहिली. दुपारी बारा वाजता व्यवहार बंद करण्यात आले. मात्र, त्यानंतर मुंबई येथे १२, गुजरातला आठ, जळगावला तीन, औरंगाबादला दोन, मध्य प्रदेश दोन, उत्तर प्रदेशात दोन अशा एकूण २९ वाहनांद्वारे माल पाठविण्यात आला. आता शेतमाल संकलनासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी करूनही बाजार समित्यांना तत्काळ अशी व्यवस्था करता आली नाही.