शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘नमामि गोदा’च्या जनप्रबोधन वारीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:19 IST

गोदामाई मृतशय्येवर पोहचली असून, तिला युद्धपातळीवर उपचाराची गरज आहे, यासाठी जनप्रबोधन करीत ‘नमामि फाउंडेशन’ची मुहूर्तमेढ विख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली रोवली गेली. गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी जनचळवळ नाशिककरांनी सुरू केली असून, याअंतर्गत ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदाजलचे कलश घेऊन गोदा प्रदूषणमुक्तीच्या जनजागृतीपर वारीला रविवारी ब्रह्मगिरी पर्वतापासून (दि.२०) प्रारंभ करण्यात आला.

नाशिक : गोदामाई मृतशय्येवर पोहचली असून, तिला युद्धपातळीवर उपचाराची गरज आहे, यासाठी जनप्रबोधन करीत ‘नमामि फाउंडेशन’ची मुहूर्तमेढ विख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली रोवली गेली. गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी जनचळवळ नाशिककरांनी सुरू केली असून, याअंतर्गत ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदाजलचे कलश घेऊन गोदा प्रदूषणमुक्तीच्या जनजागृतीपर वारीला रविवारी ब्रह्मगिरी पर्वतापासून (दि.२०) प्रारंभ करण्यात आला. त्र्यंबकेश्वरमधून उगम पावणाºया गोदावरीला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासनातर्फे फ ारसे प्रयत्न होत नाही. त्यामुळे जनप्रबोधनासाठी ‘नमामि गोदा फाउंडेशन’ स्थापन केले गेले आहे. सकाळी भर पावसात त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वत अभिनेता चिन्मय उद््गीरकर, धनश्री क्षीरसागर, पूर्वा सावजी यांनी सर करत गोदेच्या उगमस्थानावरून गोदाजलाचे कलश भरून खाली आणले. तेथून कुशावर्तावर येऊन गोदा जल आणि गोदावरीच्या मूर्तीची विधीवत पूजन करण्यात आले. येथे वारीचे स्वागत शासनाच्या वतीने तहसीलदार महेंद्र पवार यांनी शासनाच्या वतीने केले.‘नमामि’चे अध्यक्ष गोदाप्रेमी राजेश पंडित यांच्या नेतृत्वाखाली निघालेली वारी चक्रतीर्थ येथे पोहचली. तेथे गावकºयांनी स्वागत केले. तसेच स्वामी सोमेश्वरानंद यांच्या आश्रमात वारी पोहचली. येथे स्वामींनी वारीचे स्वागत केले. महिरावणी येथे वारी दाखल झाल्यानंतर तेथे ग्रामपंचायतीच्या वतीने गावकºयांनी स्वागत केले. गोदाजल कलशाचे पूजन सुवासिनींकडून करण्यात आले. महिरावणीच्या ग्रामस्थांनीही गोदा प्रदूषणमुक्तीसाठी वचन ‘नमामि’ सोबत घेतले. अ‍ॅड शिरिष दंदणे, रोहन देशपांडे, किरण भालेराव आदिंसह सदस्य, स्वयंसेवक सहभागी झाले होते.‘सोमेश्वर’ होणार प्लॅस्टिकमुक्तगोदा प्रदूषणासाठी सोमेश्वर मंदिर विश्वस्त मंडळानेही ‘नमामि गोदा फाउंडेशन’च्या गोदा सन्मान अभियानात सहभागी होत सोमेश्वर मंदिर परिसर पूर्णपणे प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प केला. भाविक, विक्रेत्यांना कॅरिबॅगचा वापर मंदिराच्या आवारात क रू दिला जाणार नसल्याचे आश्वासन विश्वस्तांनी ‘नमामि फाउंडेशन’ला दिले. जनप्रबोधन वारी मंदिरात मुक्कामी होती. सोमवारी (दि.२१) सकाळी वारी रामकुंडाच्या दिशेने मार्गस्थ होईल.