शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

डाळींब लिलावास प्रारंभ

By admin | Updated: July 19, 2016 00:34 IST

सटाणा : शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

सटाणा : राज्य सरकारने शेतमाल अडतमुक्त करण्याचे धोरण जाहीर केल्याने त्याविरु द्ध व्यापाऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून बंद पुकारल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाचा जो निर्णय होईल तो होईल तोपर्यंत शेतकऱ्यांना वेठीस न धरता खरेदी सुरू करावी, असे भाजपा-सेना युतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना केलेल्या आवाहनाला सकरात्मक प्रतिसाद देत सोमवारपासून डाळींब खरेदीस सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सोमवारी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बिंदूशेठ शर्मा, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अरविंद सोनवणे, अ‍ॅड. वसंतराव सोनवणे यांनी येथील बाजार समितीचे प्रशासक चंद्रकात विघ्ने, सचिव भास्कर तांबे, व्यापारी महेश देवरे, संदीप देवरे, राजू खैरनार, बापू वाणी आदि व्यापार्यांची व माथाडी कामगारांची भेट घेऊन बैठक घेतली. या बैठकीत डॉ. विलास बच्छाव यांनी शेतकऱ्यांची आत्ताची आर्थिक स्थिती निदर्शनास आणून दिली. आधीच शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे. आपला सर्वांचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याची अत्यंत वाईट स्थिती झाली असल्याचे त्यांनी सांगितले. शासनस्तरावर जो काही निर्णय होईल तो आम्ही मान्यच करू परंतु कर्जाच्या खाईत लोटला जाणारा शेतकरीला होत देण्यासाठी लिलाव सुरू करावे असे आवाहन केले. त्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सोमवारी डाळिंबाचे लिलाव सुरु करण्याचा निर्णय घेऊन तत्काळ त्याची अंमलबजावणी करण्यात आली . आज सुमारे साडेतीन हजार क्र ेट डाळिंबाचा लिलाव झाला. शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)