शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

खरिपाच्या पेरणीला प्रारंभ

By admin | Updated: June 15, 2017 00:15 IST

खरिपाच्या पेरणीला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : तालुक्याच्या काही भागात मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीस प्रारंभ केला आहे. परंतु जिल्हा बँकेचे व्यवहार ठप्प असल्याने बियाणे व खतांच्या खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना शेतकरी मात्र मेटाकुटीस आले असून, शासनाने नुकतेच खरिपासाठी शेतकऱ्यांना जाहीर केलेले १० हजार रु पये लवकर मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.बहुसंख्य शेतकरी हे जिल्हा बँकेचे खातेदार आहेत. त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार या खात्यावर होत असतात. अनेक नियमित कर्जदार शेतकऱ्यांनी कर्ज माफ होण्याची वाट न पाहता सोसायटीकडून घेतलेल्या पीककर्जाचा भरणा जिल्हा बँकेत केला आहे. जिल्हा बँकेचे व्यवहार सध्या ठप्प असल्याने या शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळालेले नाही. नुकतीच शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्यामुळे ज्यांनी नियमित कर्जाचा भरणा केला असे कर्जदार शेतकरी पश्चात्ताप व्यक्त करीत आहेत. सन २००८ मध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांना केलेल्या संपूर्ण कर्जमाफी योजनेत नियमित कर्जदार शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळाला नव्हता. यामुळे हे नियमित कर्जदार शेतकरी चिंतेत पडले आहेत.जिल्हा बँकेचे खातेदार असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरील उलाढाल ही थांबलेली आहे. खरीप हंगामात पीक लागवडीसाठी लागणारे बी, बियाणे व खते खरेदी करण्यासाठी या शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेतील खात्यावर पैसे असूनही बँकेतून पैसे मिळत नसल्यामुळे त्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे हे शेतकरी त्रस्त झाले आहेत. उधारीत बी-बियाणे मिळावे यासाठी बियाणे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची मिनतवारी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. चालू खरीप हंगाम सुरळीत पार पडण्यासाठी शासनाने जाहीर केल्याप्रमाणे १० हजार रु पये पीककर्ज त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.