शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

करंजगाव नदीपात्रातील पानवेली काढण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 11:06 PM

सायखेडा : निफाड तालुक्यातील करंजगाव-कोठुरे पुलाला गोदावरी नदीपात्रात अडकलेल्या पानवेली जेसीबीच्या साहाय्याने काढण्यास पाटबंधारे विभागाने प्रारंभ केला आहे. खंडू बोडके-पाटील यांनी त्याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

ठळक मुद्देसमाधान : जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तक्रार

सायखेडा : निफाड तालुक्यातील करंजगाव-कोठुरे पुलाला गोदावरी नदीपात्रात अडकलेल्या पानवेली जेसीबीच्या साहाय्याने काढण्यास पाटबंधारे विभागाने प्रारंभ केला आहे. खंडू बोडके-पाटील यांनी त्याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.पानवेली व केमिकलयुक्त रसायने सोडल्यामुळे गत आठवड्यात कोठुरे येथे मासे मृत आढळले होते. तसेच पानवेलीमुळे गोदाकाठच्या सर्वच गावांतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यातच भर म्हणून गंगापूर धरणातून गोदावरी नदीत सोडलेल्या विसर्गामुळे करंजगाव पूल व सायखेडा पुलाला धोका निर्माण झाला होता. त्याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्याकडे तक्रार करत तातडीने पानवेली काढण्यास भाग पाडण्यात आले.टाळे लावा आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सायखेडा ते चेहडी या गोदावरी नदीपात्रातील पानवेली काढण्याचे काम २९ मार्चपासून सुरू होते. मात्र बोटींच्या व अपुऱ्या मनुष्यबळाच्या साहाय्याने हे काम साडेतीन महिन्यांपासून अतिशय संथ गतीने सुरू होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे तक्रार करताच पाटबंधारे विभागाने या कामाला गती दिली. सुमारे सहा ते सात किलोमीटर पसरलेल्या गोदावरी पात्रातील पानवेली काढण्यास पाटबंधारे विभागाला यश आले. मात्र सायखेडा व करंजगाव पुलावरील अजूनही एक ते दीड किमी पानवेली शिल्लक असून जेसीबीच्या साहाय्याने या पानवेली काढण्यात येत आहेत.गोदावरी नदीपात्रात नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून दरवर्षी पानवेली वाहून येतात. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. पानवेली काढण्याबाबत सात्यत्याने पाठपुरावा करावा लागतो. पाटबंधारे विभागाने त्यावर कायमस्वरूपी निधीची तरतूद करून गोदाकाठच्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये.- खंडू बोडके-पाटील, माजी सरपंच, करंजगाव 

टॅग्स :water transportजलवाहतूकtalukaतालुका