शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

जिल्ह्यातील बाजार समितीत कांदा खरेदी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:14 IST

कळवण : कोरोना महामारीमुळे शेतकरी गेल्या वर्षभरापासून आर्थिक अडचण सहन करीत आहे. पिकविलेला माल विकला जात नाही, त्यामुळे आगामी ...

कळवण : कोरोना महामारीमुळे शेतकरी गेल्या वर्षभरापासून आर्थिक अडचण सहन करीत आहे. पिकविलेला माल विकला जात नाही, त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी लागणारे खत, बियाणे कसे खरेदी करायचे, असा मोठा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे, त्यामुळे शासनाने कोरोनाबाबत सर्व शासकीय नियम पाळून लवकरात लवकर बाजार समितीतील खरेदी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना कळवण तालुका भाजपाच्यावतीने निवेदन पाठविण्यात आले असून, त्यात शेतकऱ्यांच्या व्यथा आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडलेले असल्याचे नमूद केले आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अचानक लॉकडाऊन करावा लागला आहे. या लॉकडाऊनचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यातील सर्व बाजार समितीतील खरेदी व्यवहार बंद असल्याने बळीराजाने पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेल्या पिकांना योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

महागडे बियाणे व निसर्गाच्या लहरीपणाने आधीच अनेकांच्या तोंडातला घास हिरावला आहे. ज्याठिकाणी खरेदी-विक्री सुरू आहे, त्याठिकाणी लूट भावात माल विकावा लागत आहे. शेतकऱ्यांचा कांदा व इतर शेतमाल विकला गेल्यास त्यांना आगामी खरीप हंगामासाठी खते व बियाणे घेता येणार आहेत, त्यामुळे शासनाने बाजार समितीत कोरोनाची योग्य नियमावली राबवून सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी सुरू करावी, अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांनी केली आहे.