शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जिल्ह्यातील बाजार समितीत कांदा खरेदी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:14 IST

कळवण : कोरोना महामारीमुळे शेतकरी गेल्या वर्षभरापासून आर्थिक अडचण सहन करीत आहे. पिकविलेला माल विकला जात नाही, त्यामुळे आगामी ...

कळवण : कोरोना महामारीमुळे शेतकरी गेल्या वर्षभरापासून आर्थिक अडचण सहन करीत आहे. पिकविलेला माल विकला जात नाही, त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी लागणारे खत, बियाणे कसे खरेदी करायचे, असा मोठा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे, त्यामुळे शासनाने कोरोनाबाबत सर्व शासकीय नियम पाळून लवकरात लवकर बाजार समितीतील खरेदी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना कळवण तालुका भाजपाच्यावतीने निवेदन पाठविण्यात आले असून, त्यात शेतकऱ्यांच्या व्यथा आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडलेले असल्याचे नमूद केले आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अचानक लॉकडाऊन करावा लागला आहे. या लॉकडाऊनचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यातील सर्व बाजार समितीतील खरेदी व्यवहार बंद असल्याने बळीराजाने पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेल्या पिकांना योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

महागडे बियाणे व निसर्गाच्या लहरीपणाने आधीच अनेकांच्या तोंडातला घास हिरावला आहे. ज्याठिकाणी खरेदी-विक्री सुरू आहे, त्याठिकाणी लूट भावात माल विकावा लागत आहे. शेतकऱ्यांचा कांदा व इतर शेतमाल विकला गेल्यास त्यांना आगामी खरीप हंगामासाठी खते व बियाणे घेता येणार आहेत, त्यामुळे शासनाने बाजार समितीत कोरोनाची योग्य नियमावली राबवून सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी सुरू करावी, अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांनी केली आहे.