शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

पाऊस सुरूच, सरासरीत वाढ

By admin | Updated: July 22, 2014 01:17 IST

खरिपाच्या पेरण्यांना वेग

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून पावसाने संततधार हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. तसेच त्र्यंबकेश्वर व इगतपुरीत पावसाचा जोर कायम असल्याने तेथील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सरासरीच्या १५ टक्के पावसाची हजेरी आतापर्यंत झाली आहे.सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ५१. १ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असली तरी सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्याने पावसाच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी नोंदविण्यात आलेल्या ५१.१ मिलिमीटर पावसाच्या हजेरीत सर्वाधिक हजेरी इगतपुरी-१९, पेठ-१५, त्र्यंबकेश्वर-९, दिंडोरी-३ व अन्य तालुक्यांत अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम पट्ट्यात झालेल्या दमदार पावसामुळे मात्र भात व नागलीच्या रोपांना जीवदान मिळाले असून, जळण्याच्या मार्गावर असलेल्या या दोन्ही रोपांसह भुईमुगालाही काही प्रमाणात संजीवनी मिळाली आहे. मात्र पाऊस उशिराने सुरू झाल्याने ही तीनही पिकांचे पश्चिमपट्ट्यात ५० टक्केच उत्पादन होणार असल्याचे शेतकरी सांगतात. जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सहा लाख ३४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत त्यापैकी २९ हजार हेक्टर (४ टक्के) क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत.पावसाचा असाच जोर पश्चिमपट्ट्यासह पूर्वभागात वाढल्यास खरिपाच्या पेरण्यांना गती येण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)