शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

सलग दुरऱ्या वर्षी रखडल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:15 IST

नाशिक : दरवर्षी एप्रिल - मे महिन्यात होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांना सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा फटका बसला आहे. बदलीच्या ...

नाशिक : दरवर्षी एप्रिल - मे महिन्यात होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांना सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा फटका बसला आहे. बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या मागीलवर्षीप्रमाणेच यंदाही लांबल्या आहेत.

राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बसल्या दरवर्षी एप्रिल ते मे महिन्याच्या अखेरीस केल्या जातात. त्यामध्ये जिल्हा परिषद आणि महसूल विभागातील कर्मचऱ्यांची संख्या मोठी असते. मागीलवर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे बदल्यांचा कालावधी वाढविण्यात आला होता. सदर बदल्या मेऐवजी १० ऑगस्ट २०२० पर्यंत करण्याचे आदेश शासनाने दिले होते. दरम्यानच्या कालावधीत २०२०-२१ हे आर्थिक वर्ष संपून सन २०२१-२०२२ आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे मागील वर्षीच्या बदल्या होऊ शकल्या नव्हत्या. तीच परिस्थिती यंदा देखील निर्माण झाली आहे. यावर्षी ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नयेत, असे आदेश शासनाने काढले आहेत. त्यामुळे महसूल विभागातील १५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत.

मागीलवर्षी महसूल विभागातील पदोन्नतीने बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली होती. तसेच नव्यानेच तलाठी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पदस्थापना करण्यात आली होती. इतर बदलीप्राप्त कर्मचाऱ्यांना मात्र कोरोनामुळे बदली देता आली नव्हती. यंदाही मे महिन्यात कुणाच्याही बदल्या होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना जून २०२१ ची वाट पाहावी लागणार आहे.

कोरोनामुळे कोणत्याही प्रकारच्या बदल्या करण्यात येऊ नयेत, असे आदेश शासनाने काढलेले असले तरी सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे भरण्यासाठी तसेच अत्यावशयक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या मात्र करता येणार आहेत. गंभीर स्वरूपाच्या तक्रारीवरून एखाद्या कर्मचाऱ्याची बदली करणे आवश्यक ठरत असेल तर अशा कर्मचाऱ्यांची बदली या कालावधीत मात्र होऊ शकणार आहे.

दरम्यान, पुढील काही महिन्यात बदल्यांची प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता असली तरी प्रशासकीय बदल्यांपेक्षा अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदलीची मागणी केली असल्याचे समजते.