शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
3
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
4
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
5
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
6
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
7
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
8
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
9
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
10
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
11
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
12
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
13
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
15
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
16
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
17
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
18
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
19
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
20
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

चौकशीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या रजा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:12 IST

जिल्हा परिषदेच्या कारभाराची समितीमार्फत विभागीय आयुक्तांनी सुरू केलेली चौकशी निष्पक्ष व पारदर्शीपणे व्हावी यासाठी खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांंनीच पुढाकार घेतला असून, चौकशी समितीच्या कामकाजात खंड वा अडचणी निर्माण होवू नयेत यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाºयांच्या रजा बंद करण्यात आल्या आहेत शिवाय जे अधिकारी, कर्मचारी रजेवर गेले असतील त्यांना तत्काळ कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देभुवनेश्वरी : गैरहजर कर्मचाऱ्यांना हजर होण्याचे आदेश

नाशिक : जिल्हा परिषदेच्या कारभाराची समितीमार्फत विभागीय आयुक्तांनी सुरू केलेली चौकशी निष्पक्ष व पारदर्शीपणे व्हावी यासाठी खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांंनीच पुढाकार घेतला असून, चौकशी समितीच्या कामकाजात खंड वा अडचणी निर्माण होवू नयेत यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाºयांच्या रजा बंद करण्यात आल्या आहेत शिवाय जे अधिकारी, कर्मचारी रजेवर गेले असतील त्यांना तत्काळ कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी सहा सदस्यीय समिती गठीत केली असून, या समितीने गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेत तळ ठोकला आहे. या समितीला चौकशीत संपूर्ण सहकार्य करून देण्याच्या सूचना यापर्वीच भुवनेश्वरी यांनी अधिकाºयांना दिल्याआहेत.तथापि, या उपरही समितीला चौकशीत कोणतेही अडथळे येऊ नयेत म्हणून त्यांनी सर्व खातेप्रमुख, सहायक व कनिष्ठ प्रशासन अधिकार, सहायक लेखाधिकारी यांनी उद्देशून पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, चौकशी समितीने उपस्थित केलेले मुद्दे व माहिती पुरविणे बंधनकारक आहे. त्यामुळे समितीचे कामकाज पूर्ण होईपावेतोच्या कालावधीत कोणतेही अधिकारी व कर्मचारी मुख्यालय सोडणार नाहीत. त्याचबरोबर या कालावधीत कोणत्याही अधिकारी व कर्मचाºयांच्या रजा पूर्वपरवानगी- शिवाय मंजूर करू नये.दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या या पत्राची प्रत तत्काळ सर्व खातेप्रमुखांना रवाना करण्यात आल्या असून, रजेवर जाऊ पाहणारे व रजेवर गेलेल्या कर्मचाºयांना तत्काळ कामावर हजर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. चौकशी समितीचे कामकाज किती दिवस चालेल याचा उलगडा होत नसला तरी, चौकशी समितीला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका जिल्हा परिषदेने घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.यापूर्वी जे संबंधित अधिकारी, कर्मचारी रजेवर आहेत त्यांच्या रजा तत्काळ रद्द करून त्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. चौकशी समितीला आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करून देण्यास कोणत्याही प्रकारची टाळाटाळ अथवा दिरंगाई केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाºयांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही भुवनेश्वरी एस. यांनी दिला आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदGovernmentसरकार