शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्तासाठी एसआरपी-आरसीपीचा फौजफाटा

By admin | Updated: June 2, 2017 00:57 IST

नाशिक : राज्य सरकारच्या धोरणांविषयीचा शेतकऱ्यांच्या मनात असलेला संतापाचा गुरुवारी उद्रेक बेमुदत संपाची हाक देऊन झाला

 नाशिक : राज्य सरकारच्या धोरणांविषयीचा शेतकऱ्यांच्या मनात असलेला संतापाचा गुरुवारी उद्रेक बेमुदत संपाची हाक देऊन झाला. जिल्ह्णासह राज्यात शेतकरी संपावर गेल्यामुळे कायदा सुव्यवस्थेला कुठलाही धोका उद्भवू नये संपाला हिंसक वळण लागून उग्र स्वरूपाच्या आंदोलनात रूपांतर होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून ग्रामीण भागात राज्य राखीव दल (एसआरपी), दंगल नियंत्रण पथक (आरसीपी) चा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी, सातबारा कोरा करावा, कर्जमाफी द्यावी, अखंड वीजपुरवठा करावा, अशा एकूण सात मागण्या घेऊन बळीराजाने संपाची हाक देऊन बेमुदत ‘सुटी’ घेतली. यामुळे राज्यातील मुंबईसह अनेक महत्त्वाच्या शहरांची एकप्रकारे रसद रोखली गेली. दरम्यान, संपाची पहिली ठिणगी जिल्ह्णातील निफाड तालुक्यात पडली. वडाळीभोई, चांदवड, नैताळे या भागात संपकरी आक्रमक झाले व त्यांनी भाजीपाला घेऊन जाणारा टेम्पो पेटविला, तर दूध व फळभाज्यांची वाहतूक करणारी वाहने रोखली. टॅँकरमधील दुधाचे पाट रस्त्यावर वाहत होते आणि टमाटा, कांद्याचा सर्वत्र सडा पहावयास मिळत होता. यामुळे तणावाचे वातावरण पसरले. अखेर आक्रमक संपकऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, तर कुठे अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. दरम्यान, हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली. जिल्ह्णातील निफाड, चांदवड, येवला तालुक्यांत संपाला मोठ्या प्रमाणात हिंसक वळण लागल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. संध्याकाळनंतर ग्रामीण भागातील स्थिती नियंत्रणात आली होती.