शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

एसआरपी-आरसीपीचा फौजफाटा : बळीराजाचा संप

By admin | Updated: June 1, 2017 21:47 IST

कायदासुव्यवस्था राखण्याचा पोलिसांचा प्रयत्न; ग्रामीण भागात हिंसक वळण

नाशिक : राज्य सरकारच्या धोरणांविषयीचा शेतकऱ्यांच्या मनात असलेला संतापाचा गुरुवारी उद्रेक बेमुदत संपाची हाक देऊन झाला. जिल्ह्यासह राज्यात शेतकरी संपावर गेल्यामुळे कायदा सुव्यवस्थेला कुठलाही धोका उद्भवू नये संपाला हिंसक वळण लागून उग्र स्वरूपाच्या आंदोलनात रूपांतर होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून ग्रामीण भागात राज्य राखीव दल (एसआरपी), दंगल नियंत्रण पथक (आरसीपी) चा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी, सातबारा कोरा करावा, कर्जमाफी द्यावी, अखंड वीजपुरवठा करावा, अशा एकूण सात मागण्या घेऊन बळीराजाने संपाची हाक देऊन बेमुदत ‘सुटी’ घेतली. यामुळे राज्यातील मुंबईसह अनेक महत्त्वाच्या शहरांची एकप्रकारे रसद रोखली गेली. दरम्यान, संपाची पहिली ठिणगी जिल्ह्यातील निफाड तालुक्यात पडली. वडाळीभोई, चांदवड, नैताळे या भागात संपकरी आक्रमक झाले व त्यांनी भाजीपाला घेऊन जाणारा टेम्पो पेटविला, तर दूध व फळभाज्यांची वाहतूक करणारी वाहने रोखली. टॅँकरमधील दुधाचे पाट रस्त्यावर वाहत होते आणि टमाटा, कांद्याचा सर्वत्र सडा पहावयास मिळत होता. यामुळे तणावाचे वातावरण पसरले. अखेर आक्रमक संपकऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, तर कुठे अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. दरम्यान, हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली. जिल्ह्यातील निफाड, चांदवड, येवला तालुक्यांत संपाला मोठ्या प्रमाणात हिंसक वळण लागल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. संध्याकाळनंतर ग्रामीण भागातील स्थिती नियंत्रणात आली होती.