शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

वसंत बंधारा कोरडाठाक

By admin | Updated: May 20, 2017 01:11 IST

कसबे सुकेणे : बाणगंगा काठावरील गावांचा पाणीप्रश्न गंभीर होत असून, गावे पाणीटंचाईच्या छायेत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्ककसबे सुकेणे : बाणगंगा काठावरील गावांचा पाणीप्रश्न गंभीर होत असून, गावे पाणीटंचाईच्या छायेत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी गंगापूर धरणातून बाणगंगा नदीवरील कोरडेठाक पडलेले सर्व बंधारे भरून देण्याची जोरदार मागणी या भागातून होत आहे. बागायतदार तालुका असलेल्या निफाडमधील विविध गावांचा घसा जून महिन्याच्या शेवटी कोरडा पडला आहे. बाणगंगा काठच्या विविध गावांना पाणीटंचाईच्या झळा पोहचल्या आहेत. बाणगंगा, कादवा, गोदावरी खोऱ्यातील पाणीप्रश्न गंभीर होऊ लागला आहे. गंगापूर डाव्या कालव्याच्या आवर्तनावर या भागातील बहुतांश शेती अवलंबून आहे. सध्या गंगापूर डाव्या कालव्याद्वारे शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सुरू आहे. बाणगंगा काठच्या दीक्षी, थेरगाव, जिव्हाळे , दात्याणे, ओणे, मौजे सुकेणे, कसबे सुकेणे या गावांचा पाणीपुरवठा बाणगंगा नदीवर आधारित आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दिलासादायक चित्र असले तरी मात्र बाणगंगा काठच्या गावांना पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. कसबे सुकेणे या मोठ्या गावाला पिण्याचे पाणी पोहचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गंगापूरमधून बाणगंगेत पाणी सोडावे, अशी मागणी कसबे सुकेणेचे सरपंच छगन जाधव, उपसरपंच परेश भार्गवे, मौजे सुकेणेच्या सरपंच सुरेखा विलास गडाख, उपसरपंच नंदकुमार हंडोरे व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.