शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, 3 मुलांसह 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

वसंत बंधारा कोरडाठाक

By admin | Updated: May 20, 2017 01:11 IST

कसबे सुकेणे : बाणगंगा काठावरील गावांचा पाणीप्रश्न गंभीर होत असून, गावे पाणीटंचाईच्या छायेत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्ककसबे सुकेणे : बाणगंगा काठावरील गावांचा पाणीप्रश्न गंभीर होत असून, गावे पाणीटंचाईच्या छायेत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी गंगापूर धरणातून बाणगंगा नदीवरील कोरडेठाक पडलेले सर्व बंधारे भरून देण्याची जोरदार मागणी या भागातून होत आहे. बागायतदार तालुका असलेल्या निफाडमधील विविध गावांचा घसा जून महिन्याच्या शेवटी कोरडा पडला आहे. बाणगंगा काठच्या विविध गावांना पाणीटंचाईच्या झळा पोहचल्या आहेत. बाणगंगा, कादवा, गोदावरी खोऱ्यातील पाणीप्रश्न गंभीर होऊ लागला आहे. गंगापूर डाव्या कालव्याच्या आवर्तनावर या भागातील बहुतांश शेती अवलंबून आहे. सध्या गंगापूर डाव्या कालव्याद्वारे शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सुरू आहे. बाणगंगा काठच्या दीक्षी, थेरगाव, जिव्हाळे , दात्याणे, ओणे, मौजे सुकेणे, कसबे सुकेणे या गावांचा पाणीपुरवठा बाणगंगा नदीवर आधारित आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दिलासादायक चित्र असले तरी मात्र बाणगंगा काठच्या गावांना पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. कसबे सुकेणे या मोठ्या गावाला पिण्याचे पाणी पोहचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गंगापूरमधून बाणगंगेत पाणी सोडावे, अशी मागणी कसबे सुकेणेचे सरपंच छगन जाधव, उपसरपंच परेश भार्गवे, मौजे सुकेणेच्या सरपंच सुरेखा विलास गडाख, उपसरपंच नंदकुमार हंडोरे व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.