शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या चुकीच्या माहितीचाच प्रसार : शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:18 IST

आज मुघलकालीन इतिहास बदलल्याची टीका सुरू झाली असली तरी यापूर्वी देशात चुकीचा आणि पराभवाचाच इतिहास शिकविला गेला, वास्तव इतिहास बाहेर पडत असताना टीकाकारांची टीका आणखीन वाढणार असल्याचे मत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

नाशिक : आज मुघलकालीन इतिहास बदलल्याची टीका सुरू झाली असली तरी यापूर्वी देशात चुकीचा आणि पराभवाचाच इतिहास शिकविला गेला, वास्तव इतिहास बाहेर पडत असताना टीकाकारांची टीका आणखीन वाढणार असल्याचे मत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.भारताचा हजारो वर्षांचा इतिहास हा संघर्षाचा राहिला आहे. अरब टोळ्यांच्या आक्र मणात प्राचीन संस्कृती असलेली राष्ट्रे नामोशेष झाली. या विपरीत परिस्थितीत भारतीय संस्कृती टिकून आहे. मात्र, इतिहासात भारताला पराभूत राष्ट्र दाखविण्यात आले. प्रत्यक्षात परकीयांनी या देशावर हजारो आक्र मणे केली. मात्र, भारतीय संस्कृती अधिक बहरली असून, इतिहासाची चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्यात आल्याचे प्रतिपादन लेखक डॉ. शेवडे यांनी केले. ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभाग यांच्या विद्यमाने डॉ. कुर्तकोटी सभागृहात आयोजित केलेल्या लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्र माचे सहावे पुष्प डॉ. शेवडे यांनी ‘इस्लामी आघातांवर हिंदूचा प्रत्याघात’ या विषयावर गुंफले. याप्रसंगी डॉ. शेवडे यांनी अनुवादित केलेल्या ‘इस्लामी आघातांवर हिंदूचा प्रत्याघात’ या मराठी पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.मागील सात दशकांपासून दिल्लीत असलेल्या तत्कालीन सरकारने भारताचा इतिहास हा पराभवाचा असल्याचे भारतीयांच्या मनावर बिंबवले. सध्या शैक्षणिक पाठ्यपुस्तकात मोगलांचा इतिहास वगळण्यात आल्यामुळे टीका होत असली तरी सीबीएसईच्या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल केवळ चार ओळींची माहिती देण्यात आली आहे, त्यावेळी संबंधितांनी का टीका केली नाही असा प्रश्न शेवडे यांनी केला.