शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
3
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
5
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
6
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
7
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
8
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
9
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
10
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
11
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
12
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
13
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
14
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
15
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
16
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
17
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
18
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
19
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
20
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

स्पॉट : त्र्यंबकेश्वर टंचाईमुळे माहेरघरीच सासुरवास

By admin | Updated: June 30, 2014 00:24 IST

स्पॉट : त्र्यंबकेश्वर टंचाईमुळे माहेरघरीच सासुरवास

 पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेला त्र्यंबकेश्वर तालुका टंचाईच्या खाईत आहे. त्याला कारणही तसेच आहे. प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे आज ७४ पैकी केवळ चार योजना पूर्णत्वास आल्याने गावे, वाडे, पाडे अद्यापही तहानलेली आहेत.त्र्यंबकेश्वरला दरवर्षी २२०० ते २५०० मि.मी. पावसाची नोंद होत असताना ही स्थिती आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार ६९ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र त्या पूर्ण होण्यास दहा वर्षे लागल्याचा इतिहास आहे. उर्वरित पाच योजनांबाबत तर न बोललेलेच बरे अशी स्थिती आहे. त्यामुळेच तालुक्यातील एक लाख ३६ हजार नागरिक तहानलेलेच आहेत. ४० गावे आणि ६० वाड्यांवर टंचाईचे सावट असताना, केवळ पाच टँकर सुरु आहेत. त्यामुळे पावसाळ्यातही पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी पहाटे तीन वाजेपासून रांगा लागतात. यासाठी मंजूर टँकर आणि प्रत्यक्षात सुरू असलेले टँकर याबाबत गांभीर्याने चौकशी होणे गरजेचे आहे. तालुक्यातील सर्वच धरणांत आता मृतसाठा शिल्लक असताना, प्रशासकीय यंत्रणा अद्यापही ढिम्म आहे. येत्या दोन दिवसांत पावसाचे आगमन न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार आहे.