शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी लासलगावकरांचा उत्स्फूर्त बंद; २०-२२ दिवसांपासून पाण्यासाठी लोक त्रस्त

By धनंजय वाखारे | Updated: May 11, 2024 12:31 IST

नागरिकांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार व लासलगाव बंदची हाक दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले

शेखर देसाई

लासलगाव (नाशिक) :  लासलगाव सह लाभार्थी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनमध्ये वारंवार होणारी गळती आणि कोरडे पडलेले नांदूर मध्यमेशवर धरण अशा अनेक समस्येमुळे गेल्या 20 ते 22 दिवसांपासून लासलगावकर पाण्यापासून वंचित होते. याच्या निषेधार्थ आज लासलगावकरांनी बंद पाळत  प्रशासनाचा निषेध केला.

पाईपलाईन लिकेज, मोटार नादुरुस्ती होणे, वीज पुरवठा खंडित व धरणाने गाठलेला तळ या विविध समस्यामुळे लासलगावकरांना अनेक दिवसापासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. लहान मुले, महिला व पुरुष वर्ग आपले काम धंदे सोडून  हंडाभर पाण्यासाठी वणवण करताना दिसत होते. लासलगाव व परिसरातील नेतेमंडळी  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मग्न असून  सर्व सामान्य नागरिक मात्र  पाणी प्रश्नसाठी लढतांना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार व लासलगाव बंदची हाक दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. लासलगाव ग्रामपंचायत कार्यालय मध्ये गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी बैठक घेतली यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली मात्र या दोन्ही बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने समस्त लासलगावकरांनी बंदची हाक देत आपला रोष व्यक्त केला.

अखेर पाणी सोडले

दरम्यान या बंद मुळे प्रशासन खडबडून जागे होत तात्काळ उपयोजना करून वालदेवी मुकणे व दारणातून पाणी सोडून ते लासलगाव ला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर धरणात टाकले जाणार आहे.