शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

साहित्यिक मेळाव्याने जागवले आत्मभान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:55 IST

जिल्हा साहित्यिक मेळाव्याने प्रारंभापासून नवीन पिढीला वाचनाचे वेड लावत वाचनसंस्कृ ती जोपासण्याचे काम केले असून, या साहित्यिक मेळाव्यांनी विविध साहित्यिकांचे आत्मभान जागवल्याचा सूर ‘साहित्यिक मेळाव्याने काय दिले’ विषयावरील परिसंवादात उमटला. मु. शं औरंगाबादकर सभागृहात सुरू असलेल्या साहित्यिक मेळाव्यातील परिसंवादात गेल्या ५० वर्षांतील विविध साहित्यिक मेळावे अनुभवणाºया साहित्यिकांनी इतिहासातील आठवणींना उजाळा दिला.

नाशिक : जिल्हा साहित्यिक मेळाव्याने प्रारंभापासून नवीन पिढीला वाचनाचे वेड लावत वाचनसंस्कृ ती जोपासण्याचे काम केले असून, या साहित्यिक मेळाव्यांनी विविध साहित्यिकांचे आत्मभान जागवल्याचा सूर ‘साहित्यिक मेळाव्याने काय दिले’ विषयावरील परिसंवादात उमटला. मु. शं औरंगाबादकर सभागृहात सुरू असलेल्या साहित्यिक मेळाव्यातील परिसंवादात गेल्या ५० वर्षांतील विविध साहित्यिक मेळावे अनुभवणाºया साहित्यिकांनी इतिहासातील आठवणींना उजाळा दिला.  सार्वजनिक वाचनालयाने वाचकांचे व साहित्यिकांचेही आचारविचार प्रगल्भ करण्याबरोबरच जगण्याचे आणि लिहिण्याचे आत्मभान जागवल्याचे साहित्यप्रेमी व साहित्यिक मेळाव्याच्या माजी अध्यक्षांनी सांगितले. याच ज्ञानाने अनेकांचे जीवन समृद्ध झाले आहे. यावेळी ना. द. जोशी म्हणाले, मागील ४२ वर्षांपासून अविरतपणे मेळाव्यात सहभागी होतो. या प्रदीर्घ काळात मेळाव्याने विचाररु पी ऊर्जा देत जीवन समृद्ध करण्याचे काम केले आहे. एका पिढीला घडवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका वाचनालयाने निभावली. वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत अनेक किस्से सांगितले. साहित्यिक मेळावा अनेकांचा श्वास असून, तो वर्षभर लिहिते, वाचते राहण्याची प्रेरणा देत उत्साह टिकवून ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले. नवोदितांना वाचनाची गोडी लावून साहित्याचा जागर मेळाव्यातून झाला आहे. यात अधिक नवोदितांची भर पडण्याची गरज असल्याची अपेक्षा अभिमन्यू सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. कौशल्या भगत म्हणाल्या, पदोपदी ज्ञानोपदेश करत जीवनमार्ग सुखकर करण्याचे काम साहित्यिक मेळाव्याने केले आहे. एखादा वारकरी पंढरीच्या वारीची ज्या आतुरतेने वाट पाहतो, त्याच आतुरनेते आम्ही साहित्यिक मेळाव्याची वाट पाहत असल्याचे अ‍ॅड. मिलिंद चिंधडे यांनी सांगितले. तसेच ‘सावाना जीवन गौरव’ पुरस्काराचा उल्लेख ‘अ. वा. वर्टी सावाना जीवन गौरव’ करण्याची मागणी त्यांनी केली. अरुणा कुलकर्णी आणि संजय गुजराथी यांनी मेळाव्याविषयी आपल्या आठवणी उपस्थिताना सांगत उजाळा दिला.