शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिक मेळाव्याने जागवले आत्मभान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:55 IST

जिल्हा साहित्यिक मेळाव्याने प्रारंभापासून नवीन पिढीला वाचनाचे वेड लावत वाचनसंस्कृ ती जोपासण्याचे काम केले असून, या साहित्यिक मेळाव्यांनी विविध साहित्यिकांचे आत्मभान जागवल्याचा सूर ‘साहित्यिक मेळाव्याने काय दिले’ विषयावरील परिसंवादात उमटला. मु. शं औरंगाबादकर सभागृहात सुरू असलेल्या साहित्यिक मेळाव्यातील परिसंवादात गेल्या ५० वर्षांतील विविध साहित्यिक मेळावे अनुभवणाºया साहित्यिकांनी इतिहासातील आठवणींना उजाळा दिला.

नाशिक : जिल्हा साहित्यिक मेळाव्याने प्रारंभापासून नवीन पिढीला वाचनाचे वेड लावत वाचनसंस्कृ ती जोपासण्याचे काम केले असून, या साहित्यिक मेळाव्यांनी विविध साहित्यिकांचे आत्मभान जागवल्याचा सूर ‘साहित्यिक मेळाव्याने काय दिले’ विषयावरील परिसंवादात उमटला. मु. शं औरंगाबादकर सभागृहात सुरू असलेल्या साहित्यिक मेळाव्यातील परिसंवादात गेल्या ५० वर्षांतील विविध साहित्यिक मेळावे अनुभवणाºया साहित्यिकांनी इतिहासातील आठवणींना उजाळा दिला.  सार्वजनिक वाचनालयाने वाचकांचे व साहित्यिकांचेही आचारविचार प्रगल्भ करण्याबरोबरच जगण्याचे आणि लिहिण्याचे आत्मभान जागवल्याचे साहित्यप्रेमी व साहित्यिक मेळाव्याच्या माजी अध्यक्षांनी सांगितले. याच ज्ञानाने अनेकांचे जीवन समृद्ध झाले आहे. यावेळी ना. द. जोशी म्हणाले, मागील ४२ वर्षांपासून अविरतपणे मेळाव्यात सहभागी होतो. या प्रदीर्घ काळात मेळाव्याने विचाररु पी ऊर्जा देत जीवन समृद्ध करण्याचे काम केले आहे. एका पिढीला घडवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका वाचनालयाने निभावली. वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत अनेक किस्से सांगितले. साहित्यिक मेळावा अनेकांचा श्वास असून, तो वर्षभर लिहिते, वाचते राहण्याची प्रेरणा देत उत्साह टिकवून ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले. नवोदितांना वाचनाची गोडी लावून साहित्याचा जागर मेळाव्यातून झाला आहे. यात अधिक नवोदितांची भर पडण्याची गरज असल्याची अपेक्षा अभिमन्यू सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. कौशल्या भगत म्हणाल्या, पदोपदी ज्ञानोपदेश करत जीवनमार्ग सुखकर करण्याचे काम साहित्यिक मेळाव्याने केले आहे. एखादा वारकरी पंढरीच्या वारीची ज्या आतुरतेने वाट पाहतो, त्याच आतुरनेते आम्ही साहित्यिक मेळाव्याची वाट पाहत असल्याचे अ‍ॅड. मिलिंद चिंधडे यांनी सांगितले. तसेच ‘सावाना जीवन गौरव’ पुरस्काराचा उल्लेख ‘अ. वा. वर्टी सावाना जीवन गौरव’ करण्याची मागणी त्यांनी केली. अरुणा कुलकर्णी आणि संजय गुजराथी यांनी मेळाव्याविषयी आपल्या आठवणी उपस्थिताना सांगत उजाळा दिला.