शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

संपत्ती गरजूंसाठी खर्च करा : शाकीर अली नुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:13 IST

आज मनुष्याचे जीवन तणावग्रस्त बनले आहे. कारण समाजातील गोरगरीब गरजू घटकांकडे त्याचे दुर्लक्ष होत आहे. जे लोक कुठलाही देखावा न करता गरजूंच्या उन्नतीसाठी संपत्तीचा काही भाग खर्च करतात,

नाशिक : आज मनुष्याचे जीवन तणावग्रस्त बनले आहे. कारण समाजातील गोरगरीब गरजू घटकांकडे त्याचे दुर्लक्ष होत आहे. जे लोक कुठलाही देखावा न करता गरजूंच्या उन्नतीसाठी संपत्तीचा काही भाग खर्च करतात, त्यांचे जीवन कधीही तणावग्रस्त राहत नाही, असे कुराणने स्पष्ट केले आहे; मात्र दुर्दैवाने समाजातील धनिकांना या शिकवणीचा विसर पडत चालला आहे, असे प्रतिपादन सुन्नी दावत-ए-इस्लामीचे अध्यक्ष ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना शाकीर अली नुरी यांनी केले.सुन्नी दावत-ए-इस्लामी या धार्मिक राष्टÑीय संघटनेच्या नाशिक शाखेच्या वतीने शहरातील शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर आयोजित विभागीय ‘सुन्नी इज्तेमा’च्या (धार्मिक मेळावा) समारोपप्रसंगी रविवारी (दि.२७) नुरी मार्गदर्शन करत होते. यावेळी मंचावर शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, मौलाना सय्यद अमिनुल कादरी, प्रा. कारी रिजवान खान, मौलाना जाहीद आदी धर्मगुरू व उलेमा उपस्थितहोते. ‘जकात-दानधर्म’ ही संकल्पना विशद करताना ते म्हणाले, सुफी संतांचे जीवन कधीही तणावग्रस्त नव्हते. कारण सुफी संतांनी कधीही संपत्तीचा मोह केला नाही, तर त्यांनी ‘कुराण’च्या शिकवणीनुसार गोरगरीब घटकांवर ती खर्च करण्यास प्राधान्य दिले.‘जकात’चे ‘पवित्र’ व ‘वाढ’ असे दोन अर्थ आहेत, ते आपण समजून घेतले पाहिजे, असेही नुरी यावेळी म्हणाले. आजचा मुस्लीम सुफी संतांची शिकवण विसरत चालला असल्याची खंती त्यांनी व्यक्त केली. मेळाव्याचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला होता. पहिला दिवस महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. रविवार हा पुरुषांसाठी होता. दिवसभरात विविध धर्मगुरूंनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले. मेळाव्यासाठी मुंबईसह नाशिक विभागातील विविध जिल्ह्यांमधून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिकरीत्या संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित दरुदोसलामचे पठण करत मेळाव्याचा समारोप करण्यात आला.उपासनेचा अहंकार नकोनमाजपठणाने अहंकार नष्ट होतो आणि तो झालाच पाहिजे, जर तसे होत नसेल तर समाजबांधवाने आत्मपरीक्षण करत कुराणच्या शिकवणीचा अभ्यास करावा. अल्लाहची उपासना (इबादत) करताना मुस्लिमांनी अहंकार बाळगता कामा नये, अशी शिकवण कुराण व हजरत मुहम्मद पैगंबर यांनी दिली आहे. नमाजमुळे मन स्वच्छ व निर्मळ तर होतेच, पण मानवी संवेदनाही जागृत होतात असे मौलाना शाकीर अली म्हणाले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuslimमुस्लीम