शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
3
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
4
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
5
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
6
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
7
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
8
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
10
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
11
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
12
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
13
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
14
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
15
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
16
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
17
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
18
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
19
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
20
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
Daily Top 2Weekly Top 5

संपत्ती गरजूंसाठी खर्च करा : शाकीर अली नुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:13 IST

आज मनुष्याचे जीवन तणावग्रस्त बनले आहे. कारण समाजातील गोरगरीब गरजू घटकांकडे त्याचे दुर्लक्ष होत आहे. जे लोक कुठलाही देखावा न करता गरजूंच्या उन्नतीसाठी संपत्तीचा काही भाग खर्च करतात,

नाशिक : आज मनुष्याचे जीवन तणावग्रस्त बनले आहे. कारण समाजातील गोरगरीब गरजू घटकांकडे त्याचे दुर्लक्ष होत आहे. जे लोक कुठलाही देखावा न करता गरजूंच्या उन्नतीसाठी संपत्तीचा काही भाग खर्च करतात, त्यांचे जीवन कधीही तणावग्रस्त राहत नाही, असे कुराणने स्पष्ट केले आहे; मात्र दुर्दैवाने समाजातील धनिकांना या शिकवणीचा विसर पडत चालला आहे, असे प्रतिपादन सुन्नी दावत-ए-इस्लामीचे अध्यक्ष ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना शाकीर अली नुरी यांनी केले.सुन्नी दावत-ए-इस्लामी या धार्मिक राष्टÑीय संघटनेच्या नाशिक शाखेच्या वतीने शहरातील शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर आयोजित विभागीय ‘सुन्नी इज्तेमा’च्या (धार्मिक मेळावा) समारोपप्रसंगी रविवारी (दि.२७) नुरी मार्गदर्शन करत होते. यावेळी मंचावर शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, मौलाना सय्यद अमिनुल कादरी, प्रा. कारी रिजवान खान, मौलाना जाहीद आदी धर्मगुरू व उलेमा उपस्थितहोते. ‘जकात-दानधर्म’ ही संकल्पना विशद करताना ते म्हणाले, सुफी संतांचे जीवन कधीही तणावग्रस्त नव्हते. कारण सुफी संतांनी कधीही संपत्तीचा मोह केला नाही, तर त्यांनी ‘कुराण’च्या शिकवणीनुसार गोरगरीब घटकांवर ती खर्च करण्यास प्राधान्य दिले.‘जकात’चे ‘पवित्र’ व ‘वाढ’ असे दोन अर्थ आहेत, ते आपण समजून घेतले पाहिजे, असेही नुरी यावेळी म्हणाले. आजचा मुस्लीम सुफी संतांची शिकवण विसरत चालला असल्याची खंती त्यांनी व्यक्त केली. मेळाव्याचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला होता. पहिला दिवस महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. रविवार हा पुरुषांसाठी होता. दिवसभरात विविध धर्मगुरूंनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले. मेळाव्यासाठी मुंबईसह नाशिक विभागातील विविध जिल्ह्यांमधून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिकरीत्या संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित दरुदोसलामचे पठण करत मेळाव्याचा समारोप करण्यात आला.उपासनेचा अहंकार नकोनमाजपठणाने अहंकार नष्ट होतो आणि तो झालाच पाहिजे, जर तसे होत नसेल तर समाजबांधवाने आत्मपरीक्षण करत कुराणच्या शिकवणीचा अभ्यास करावा. अल्लाहची उपासना (इबादत) करताना मुस्लिमांनी अहंकार बाळगता कामा नये, अशी शिकवण कुराण व हजरत मुहम्मद पैगंबर यांनी दिली आहे. नमाजमुळे मन स्वच्छ व निर्मळ तर होतेच, पण मानवी संवेदनाही जागृत होतात असे मौलाना शाकीर अली म्हणाले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuslimमुस्लीम