शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

संपत्ती गरजूंसाठी खर्च करा : शाकीर अली नुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:13 IST

आज मनुष्याचे जीवन तणावग्रस्त बनले आहे. कारण समाजातील गोरगरीब गरजू घटकांकडे त्याचे दुर्लक्ष होत आहे. जे लोक कुठलाही देखावा न करता गरजूंच्या उन्नतीसाठी संपत्तीचा काही भाग खर्च करतात,

नाशिक : आज मनुष्याचे जीवन तणावग्रस्त बनले आहे. कारण समाजातील गोरगरीब गरजू घटकांकडे त्याचे दुर्लक्ष होत आहे. जे लोक कुठलाही देखावा न करता गरजूंच्या उन्नतीसाठी संपत्तीचा काही भाग खर्च करतात, त्यांचे जीवन कधीही तणावग्रस्त राहत नाही, असे कुराणने स्पष्ट केले आहे; मात्र दुर्दैवाने समाजातील धनिकांना या शिकवणीचा विसर पडत चालला आहे, असे प्रतिपादन सुन्नी दावत-ए-इस्लामीचे अध्यक्ष ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना शाकीर अली नुरी यांनी केले.सुन्नी दावत-ए-इस्लामी या धार्मिक राष्टÑीय संघटनेच्या नाशिक शाखेच्या वतीने शहरातील शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर आयोजित विभागीय ‘सुन्नी इज्तेमा’च्या (धार्मिक मेळावा) समारोपप्रसंगी रविवारी (दि.२७) नुरी मार्गदर्शन करत होते. यावेळी मंचावर शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, मौलाना सय्यद अमिनुल कादरी, प्रा. कारी रिजवान खान, मौलाना जाहीद आदी धर्मगुरू व उलेमा उपस्थितहोते. ‘जकात-दानधर्म’ ही संकल्पना विशद करताना ते म्हणाले, सुफी संतांचे जीवन कधीही तणावग्रस्त नव्हते. कारण सुफी संतांनी कधीही संपत्तीचा मोह केला नाही, तर त्यांनी ‘कुराण’च्या शिकवणीनुसार गोरगरीब घटकांवर ती खर्च करण्यास प्राधान्य दिले.‘जकात’चे ‘पवित्र’ व ‘वाढ’ असे दोन अर्थ आहेत, ते आपण समजून घेतले पाहिजे, असेही नुरी यावेळी म्हणाले. आजचा मुस्लीम सुफी संतांची शिकवण विसरत चालला असल्याची खंती त्यांनी व्यक्त केली. मेळाव्याचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला होता. पहिला दिवस महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. रविवार हा पुरुषांसाठी होता. दिवसभरात विविध धर्मगुरूंनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले. मेळाव्यासाठी मुंबईसह नाशिक विभागातील विविध जिल्ह्यांमधून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिकरीत्या संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित दरुदोसलामचे पठण करत मेळाव्याचा समारोप करण्यात आला.उपासनेचा अहंकार नकोनमाजपठणाने अहंकार नष्ट होतो आणि तो झालाच पाहिजे, जर तसे होत नसेल तर समाजबांधवाने आत्मपरीक्षण करत कुराणच्या शिकवणीचा अभ्यास करावा. अल्लाहची उपासना (इबादत) करताना मुस्लिमांनी अहंकार बाळगता कामा नये, अशी शिकवण कुराण व हजरत मुहम्मद पैगंबर यांनी दिली आहे. नमाजमुळे मन स्वच्छ व निर्मळ तर होतेच, पण मानवी संवेदनाही जागृत होतात असे मौलाना शाकीर अली म्हणाले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuslimमुस्लीम