शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
3
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
4
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
5
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
6
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
7
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
8
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
9
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
10
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
11
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
12
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
13
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
14
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
15
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
16
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
17
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
18
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
19
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
20
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास

विकासकामांची गती जिल्ह्यात खुंटली

By admin | Updated: January 17, 2016 00:48 IST

खर्च २५ टक्के : ७५ टक्के खर्चाचे आव्हान

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात अडकलेली शासकीय यंत्रणा व जिल्हा नियोजन समितीची सहा महिने लांबलेली बैठक पाहता, गेल्या दहा महिन्यांत जिल्हा नियोजन विकास आराखड्यात तरतूद करण्यात आलेल्या एकूण रकमेच्या फक्त २५ टक्के खर्च विविध यंत्रणा करू शकल्या असून, जिल्ह्याच्या आजवरच्या विकास वाटचालीत ही सर्वात मोठी पीछेहाट मानली जात आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर विपरीत होऊन गती खुंटल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्णाच्या विकासकामांसाठी तरतूद करण्यात आलेल्या ८०१ कोटी रुपयांच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, समाज कल्याण अशा संबंधित सर्वच यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक बोलाविली होती, पण त्या बैठकीला खुद्द जिल्हाधिकारी अनुपस्थित राहिल्याने जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनीच यासंदर्भातील आढावा घेतला. त्यात शासनाने नियोजन आराखड्यानुसार ८०१ कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून, ४३५ कोटी रुपयांचे विविध यंत्रणांना वाटप करण्यात आलेले आहे. (पान ७ वर)त्यापैकी डिसेंबर अखेर २०९ कोटीच विकासकामांवर खर्च होऊ शकले आहेत. नियोजन आराखड्यातील तरतुदीच्या प्रमाणात हा खर्च जेमतेम २७ टक्केच आहे. जिल्ह्णाच्या विकासासाठी निधीची उपलब्धता असतानाही तो खर्च करण्यात जवळपास सर्वच यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत. जिल्हा परिषदेची वाटचाल अतिशय संथ गतीने सुरू असून, त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या योजना व कामांसाठी २६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येऊन त्यापैकी ८३ कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीने उपलब्ध करून दिले व ते खर्च झाल्याचे जिल्हा परिषदेचे म्हणणे असले तरी, उर्वरित निधी खर्चाबाबतचे कोणतेही नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही. आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी बांधकाम व ग्रामपंचायत तसेच इमारत व दळणवळण या विभागांकरवी करण्यात येणाऱ्या कामांची अंदाजपत्रकेच तयार नाहीत, तर काही कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आलेली नसल्याची बाब या बैठकीत उघडकीस आली. त्यामुळे ३० जानेवारीपर्यंत कामांची अंदाजपत्रके, मंजुरी व प्रशासकीय मान्यता देण्याचे काम पूर्ण करावे अन्यथा १५ मार्च नंतर कोणत्याही कामांसाठी पैसे उपलब्ध करून दिले जाणार नाहीत, शिवाय निधी नको असेल तर तसे सांगा, अशी तंबीही या बैठकीत देण्यात आली. या आराखड्यानुसार आदिवासी विभागही जेमतेम २२ टक्के निधी खर्च करू शकला आहे, तर अनुसूचित जाती जमाती विभागाने २५ टक्के खर्च केला आहे.