शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

इगतपुरी तालुक्यात भात लागवडीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 01:08 IST

घोटी : भात पिकाचे आगार आणि पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने भाताच्या लागवडीला वेग आला आहे. यामुळे तालुक्यातील बळीराजा शेतकामात व्यस्त झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. तालुक्यात ९० टक्के भाताची तर अवघी दहा टक्के नागली आणि वरई पिकाची लागवड केली जाते. यातील भातवगळता इतर पिकांची लागवड पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देसमाधानकारक पाऊस : आठवडाभरात सरासरी गाठण्याची शक्यताबागायतीमुळे खरिपाच्या लागवडीत घट

घोटी : भात पिकाचे आगार आणि पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने भाताच्या लागवडीला वेग आला आहे. यामुळे तालुक्यातील बळीराजा शेतकामात व्यस्त झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. तालुक्यात ९० टक्के भाताची तर अवघी दहा टक्के नागली आणि वरई पिकाची लागवड केली जाते. यातील भातवगळता इतर पिकांची लागवड पूर्ण झाली आहे. दरम्यान, इगतपुरी तालुक्यात मागणीपेक्षा अधिक खतांचा पुरवठा झाला असल्याने तालुक्यात खताचा कुठलाही तुटवडानसल्याचे पंचायत समिती कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.तालुक्यात भात पिकाबरोबर माळरानावर नागली आणि वरई या पिकाची लागवड करण्यात येते. ही लागवड केवळ दहा टक्के असते, मात्र मध्यंतरी पावसाने काही दिवसासाठी विश्रांती घेतल्याने या कालखंडात या दोन्ही पिकाची लागवड पूर्ण झाली आहे.गेल्या काही वर्षांपासून इगतपुरी तालुक्यातील धरणातील मुबलक पाण्यामुळे शेतकºयांचा बागायती पिके घेण्याकडे कल आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी भातपिकाऐवजी बागायती पिके घेण्यासाठी अनेक हेक्टर क्षेत्र पडित ठेवतात. यामुळे खरिपाच्या लागवडीत काही वर्षांपासून घट झाली आहे.