शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

देशाच्या विरोधात बोलणे हा देशद्रोह

By admin | Updated: May 29, 2016 00:17 IST

पर्रिकर : नूतनीकृत सावरकर वाड्याचे लोकार्पण

नाशिक : राष्ट्रभक्तीचे प्रेरणास्रोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाला देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीचा वारसा दिला असून, सावरकरांचा वारसा जपणाऱ्या या देशात देशाविरोधात बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. या देशाचे तुकडे व्हावे, असे कोणाला वाटत असेल तर त्यांना देशद्रोहीच म्हटले पाहिजे, असे मत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले. देशातील नागरिकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर तथा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रातून देशप्रेम व राष्ट्रभक्तीसारख्या गुणांचे अनुकरण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सावरकरांचे जन्मस्थळ असलेल्या सावरकर वाड्याच्या नूतनीकृ त इमारतीचे पर्रिकर यांच्या हस्ते शनिवारी (दि.२८) उद्घाटन झाले. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, हेमंत गोडसे, नगराध्यक्ष अनिता करंजकर, माजी मंत्री बबन घोलप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, बाबूराव मोजाड, शिवराम झोले, निवृत्ती जाधव आादि उपस्थित होते. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र जेएनयूतील देशविरोधी घोषणांच्या प्रकरणावर बोलताना क न्हैया कुमारचा नामोल्लेख टाळत पर्रिकर म्हणाले, या देशाचे तुकडे व्हावे, असे कुणाला वाटत असेल तर त्यांना देशद्रोहीच म्हटले पाहिजे. मत मांडण्याचे स्वातंत्र्य म्हणजे देशाविरोधात बोलण्याचे स्वातंत्र्य नाही, असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, पर्रिकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वाड्यातील सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रास्ताविक हेमंत गोडसे यांनी केले. (प्रतिनिधी)