शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

देशाच्या विरोधात बोलणे हा देशद्रोह

By admin | Updated: May 29, 2016 00:17 IST

पर्रिकर : नूतनीकृत सावरकर वाड्याचे लोकार्पण

नाशिक : राष्ट्रभक्तीचे प्रेरणास्रोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाला देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीचा वारसा दिला असून, सावरकरांचा वारसा जपणाऱ्या या देशात देशाविरोधात बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. या देशाचे तुकडे व्हावे, असे कोणाला वाटत असेल तर त्यांना देशद्रोहीच म्हटले पाहिजे, असे मत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले. देशातील नागरिकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर तथा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रातून देशप्रेम व राष्ट्रभक्तीसारख्या गुणांचे अनुकरण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सावरकरांचे जन्मस्थळ असलेल्या सावरकर वाड्याच्या नूतनीकृ त इमारतीचे पर्रिकर यांच्या हस्ते शनिवारी (दि.२८) उद्घाटन झाले. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, हेमंत गोडसे, नगराध्यक्ष अनिता करंजकर, माजी मंत्री बबन घोलप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, बाबूराव मोजाड, शिवराम झोले, निवृत्ती जाधव आादि उपस्थित होते. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र जेएनयूतील देशविरोधी घोषणांच्या प्रकरणावर बोलताना क न्हैया कुमारचा नामोल्लेख टाळत पर्रिकर म्हणाले, या देशाचे तुकडे व्हावे, असे कुणाला वाटत असेल तर त्यांना देशद्रोहीच म्हटले पाहिजे. मत मांडण्याचे स्वातंत्र्य म्हणजे देशाविरोधात बोलण्याचे स्वातंत्र्य नाही, असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, पर्रिकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वाड्यातील सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रास्ताविक हेमंत गोडसे यांनी केले. (प्रतिनिधी)