शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
5
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
6
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
7
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
8
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक अवस्था बिघडली, रस्त्यावर भयानक अवस्थेत सापडली
9
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
10
दुर्मिळ आजारामुळे १२ किलोंनी वाढला तरुणीच्या स्तनांचा आकार, असह्य वेदना होणारा भयंकर आजार
11
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
12
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
13
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
14
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
15
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
16
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
17
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
18
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
19
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
20
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?

सोयाबिन तेल १५५ रुपये लिटर ; मेथीची जुडी ३८ रुपयांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:13 IST

सफरचंद, संत्रा, डाळींब आणि इतर फळांची आवक स्थिर आहे. फळांना सध्या चांगली मागणी असल्याने भाव वाढलेले आहेत. घाऊक बाजारात ...

सफरचंद, संत्रा, डाळींब आणि इतर फळांची आवक स्थिर आहे. फळांना सध्या चांगली मागणी असल्याने भाव वाढलेले आहेत. घाऊक बाजारात आरक्ता डाळींब ८० रुपये किलोने विकले जात आहे. किरकोळ बाजारात यापेक्षा अधिक दर आकारला जातो. किराणा बाजारात सर्व डाळींचे भाव वाढलेले आहेत. सर्वच बाजाराला लॉकडाऊनचा फटका बसला असून ग्राहकी कमी झाली आहे. काही शहरांमध्ये किरकोळ विक्रेत्यांना रस्त्यावर भाजीपाला विक्रीसाठी बसू दिले जात नसल्याचा फटका काहीअंशी भाजीपाल्याला सहन करावा लागतो.

चौकट -

कांदापात ४० रुपये जुडी

कांदा दरात सातत्याने घसरण होत असताना कांदापातीला मात्र सध्या चांगला दर मिळत असून घाऊक बाजारात ४० रुपये जुडी विकली जात आहे. तर मेथी ३८ रुपये जुडी आहे.

चौकट-

संत्री ७० रुपये किलो

घाऊक बाजारात संत्री ४० पासून ७० रुपयांपर्यत तर सफरचंद १०० पासून १२० रुपये किलो या दराने विकली जात आहे. सध्या डाळींबाची ४०० ते ५०० क्विंटलपर्यंत आवक होत असून ८० ते ९० रुपये किलो विकले जात आहे.

चौकट-

तांदुळ महागला

मसुरी व्यतिरिक्त लष्करी, कमोद आदी प्रकारच्या तांदळाच्या दरात तीन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे. स्थिर झालेले खाद्यतेलाचे भा पुन्हा तेजीकाडे झुकले आहेत. सर्वच खाद्य तेलांच्या किमती वाढल्या आहेत.

कोट-

शासनाने लॉकडाऊनमध्ये किराणा मालाच्या दुकानाची वेळ सकाळी ९ ते दुपारी २ अशी करायला हवी. सकाळी ७ ते ११ ची वेळ चुकीची असून त्याचा ग्राहकीवर मोठा परिणाम झाला आहे. - अनिल बुब, किराणा व्यापारी

कोट-

ऊन्हामुळे विहिरींचे पाणी कमी झाले आहे. भाजीपाला पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. त्याचा उत्पादनावर नरिणाम झाला आहे. लॉकडाऊनमळे भाजीपाल्याला उन्हाळ्यात मिळणाऱ्या भावापेक्षा सध्याचे दर कमी आहेत. - अविनाश रौंदळ, शेतकरी

कोट-

कोरोनामुळे रोजगार बंद पडला आहे. आहे त्या बचतीवर घर चालवावे लागत असताना विविध वस्तूंची सातत्याने दरवाढ होत आहे. यामुळे पैसा पुरत नाही. शासनाने दरवाढ कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. - रजनी जाधव, गृहिणी