शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

सोयाबिन तेल १५५ रुपये लिटर ; मेथीची जुडी ३८ रुपयांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:14 IST

सफरचंद, संत्रा, डाळींब आणि इतर फळांची आवक स्थिर आहे. फळांना सध्या चांगली मागणी असल्याने भाव वाढलेले आहेत. घाऊक बाजारात ...

सफरचंद, संत्रा, डाळींब आणि इतर फळांची आवक स्थिर आहे. फळांना सध्या चांगली मागणी असल्याने भाव वाढलेले आहेत. घाऊक बाजारात आरक्ता डाळींब ८० रुपये किलोने विकले जात आहे. किरकोळ बाजारात यापेक्षा अधिक दर आकारला जातो. किराणा बाजारात सर्व डाळींचे भाव वाढलेले आहेत. सर्वच बाजाराला लॉकडाऊनचा फटका बसला असून ग्राहकी कमी झाली आहे. काही शहरांमध्ये किरकोळ विक्रेत्यांना रस्त्यावर भाजीपाला विक्रीसाठी बसू दिले जात नसल्याचा फटका काहीअंशी भाजीपाल्याला सहन करावा लागतो.

चौकट -

कांदापात ४० रुपये जुडी

कांदा दरात सातत्याने घसरण होत असताना कांदापातीला मात्र सध्या चांगला दर मिळत असून घाऊक बाजारात ४० रुपये जुडी विकली जात आहे. तर मेथी ३८ रुपये जुडी आहे.

चौकट-

संत्री ७० रुपये किलो

घाऊक बाजारात संत्री ४० पासून ७० रुपयांपर्यत तर सफरचंद १०० पासून १२० रुपये किलो या दराने विकली जात आहे. सध्या डाळींबाची ४०० ते ५०० क्विंटलपर्यंत आवक होत असून ८० ते ९० रुपये किलो विकले जात आहे.

चौकट-

तांदुळ महागला

मसुरी व्यतिरिक्त लष्करी, कमोद आदी प्रकारच्या तांदळाच्या दरात तीन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे. स्थिर झालेले खाद्यतेलाचे भा पुन्हा तेजीकाडे झुकले आहेत. सर्वच खाद्य तेलांच्या किमती वाढल्या आहेत.

कोट-

शासनाने लॉकडाऊनमध्ये किराणा मालाच्या दुकानाची वेळ सकाळी ९ ते दुपारी २ अशी करायला हवी. सकाळी ७ ते ११ ची वेळ चुकीची असून त्याचा ग्राहकीवर मोठा परिणाम झाला आहे. - अनिल बुब, किराणा व्यापारी

कोट-

ऊन्हामुळे विहिरींचे पाणी कमी झाले आहे. भाजीपाला पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. त्याचा उत्पादनावर नरिणाम झाला आहे. लॉकडाऊनमळे भाजीपाल्याला उन्हाळ्यात मिळणाऱ्या भावापेक्षा सध्याचे दर कमी आहेत. - अविनाश रौंदळ, शेतकरी

कोट-

कोरोनामुळे रोजगार बंद पडला आहे. आहे त्या बचतीवर घर चालवावे लागत असताना विविध वस्तूंची सातत्याने दरवाढ होत आहे. यामुळे पैसा पुरत नाही. शासनाने दरवाढ कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. - रजनी जाधव, गृहिणी