शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

येवला तालुक्यात सोयाबीन, मका पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 14:33 IST

देशमाने : येवला तालुक्यातील गत वर्षाचा दुष्काळ, अन चालू वर्षाचा ओला दुष्काळ यामुळे शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला आहे. चालू खरीप हंगाम तर शेतकरी वर्गाचा पूर्ण कसोटी घेणारा ठरला आहे. या हंगामात एकापाठोपाठ समस्या शेतकर्यांची पाठ सोडायला तयार नाही.अनेक संकटाचा सामना करत शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तरु ण शेतकरी वर्ग तर आता शेतीच कसायला नको म्हणतो आहे.

देशमाने : येवला तालुक्यातील गत वर्षाचा दुष्काळ, अन चालू वर्षाचा ओला दुष्काळ यामुळे शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला आहे. चालू खरीप हंगाम तर शेतकरी वर्गाचा पूर्ण कसोटी घेणारा ठरला आहे. या हंगामात एकापाठोपाठ समस्या शेतकर्यांची पाठ सोडायला तयार नाही.अनेक संकटाचा सामना करत शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तरु ण शेतकरी वर्ग तर आता शेतीच कसायला नको म्हणतो आहे. दिवस-रात्र शेतात कष्ट करून ही कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटाने शेती व्यवसाय शेकऱ्यांसाठी आता जीवघेणा ठरत आहे. परिसरात अल्पपावसाच्या ओलीवर खरिपाच्या पेरण्या झाल्या. त्यानंतर सुमारे एक महिना पावसाने ओढ दिली. ऐन बहरात असताना सोयाबीन, बाजरी व मका ही पिके सुकून उत्पादन घटले. शेतकऱ्यांना खरिपात फायदेशीर असलेल्या मका पिकावर यावेळी लष्करी अळीचे संकट ओढवले. पीक वाचिवण्यासाठी औषध फवारणीचा शेतकर्यास प्रति एकर दहा हजार रूपये अतिरिक्त खर्च करावा लागला. सोयाबीन व बाजरी पिकांचे देखील उत्पादन घटले. कांदा पीक तर वारंवार रोपे बदलत्या हवामानामुळे कुजल्याने अनेक शेतकºयांना अद्याप कांदा लागवड करता आली नाही. मोचक्याच शेतकर्यांकडे ती देखील अल्पप्रमानात कांदा लागवड झाली. द्राक्ष उत्पादक शेतकरी तर संपूर्ण पिकच गेल्याने पूर्णत: उध्वस्त झाला आहे. एकूणच परतीच्या पावसाने मोठ्या कष्टाने उभा केलेला खरीप हंगाम शेतकर्यांच्या हातातून हिसकवला असून शेती अन शेतकºयांचे दिवाळे काढले आहे. मुख्य पीक असलेल्या कांदा पिकाचे रोप चौथ्यांदा टाकण्याची वेळ आली आहे. पण आता स्वत:जवळील बियाणे देखील संपल्याने अन सिड्स बियाणे विकत घेण्यासाठी पैसाही नाही, अशा विचित्र विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक