शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात पेरण्या संकटात !

By admin | Updated: July 7, 2014 00:20 IST

जून महिनाही गेला कोरडाच : धरणांत जलसाठा जेमतेम

गणेश धुरी

नाशिकअगदी ७ जूनलाच नियमाने हजेरी लावण्याची नाशिकला परंपरा असलेल्या पावसाने गेल्या वर्षापासून ‘हजेरीत’ बदल केल्याने जिल्ह्यातील बळीराजाची चिंता काहीशी वाढली आहे. यंदा तर जून संपून जुलै उजाडला तरी तुरळक अपवाद वगळता मान्सूनने दडी मारल्याने खरिपाच्या साडेसहा लाख हेक्टरवरील पेरण्या संकटात सापडल्या असून, भात-नागली पिके हातची जाण्याची भीती व्यक्त आहे, तर तूर, भुईमुगाची पिके पावसाअभावी जळाल्याने या हंगामात या पिकांचे उत्पादन नगण्य राहण्याचा धोका वाढला आहे. गंगापूर धरणाचा अपवाद वगळता अन्य धरणांमध्ये १० ते १५ टक्क्यांच्या आतच जलसाठा असून, नाशिक शहरात आता पाणीकपात सुरू होणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीच्या पर्जन्यमानाची आकडेवारी पाहिल्यास २ जुलैपर्यंत मागील वर्षी २४९ मिलिमीटर पाऊस झाला होता, यावर्षी तो अवघा २८.७५ मि.मी. इतकाच झाला आहे. पाऊस लांबल्याने खतांच्या विक्रीवरही प्रतिकूल परिणाम होऊन ४० हजार मेट्रिक टनांहून जादा खते विक्रीअभावी पडून आहेत. लांबलेल्या पावसाने कापूस, मका या पिकांचे क्षेत्र घटून बाजरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. खरिपाच्या पेरण्यांवर संकटजिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र सहा लाख ३४ हजार ६०० हेक्टर असून, यावर्षी पाऊस लांबल्याने पेरण्याही लांबल्या आहेत. ज्या काही ४४४ हेक्टर क्षेत्रावरील नाममात्र पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत, त्यात मका, तूर, कापूस या पिकांसह ऊसाचा समावेश आहे. कमी झालेली सरासरीगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची सरासरी १ जून ते २ जुलैदरम्यान अत्यंत नाममात्र म्हणजेच २८४ मिलिमीटर इतकी कमी राहिलेली आहे. यावर्षी १ जून ते २ जुलै यादरम्यान अवघा ४३१.३ मि़मी़ पाऊस झालेला आहे़ मागील वर्षी याचदरम्यान तब्बल ३७४०.५ मिलिमीटर इतका झाला होता. वार्षिक सरासरीच्या २८ टक्केजिल्ह्याची वार्षिक सरासरी १०१३.३९ इतकी असताना, २ जुलै २०१३ ला २४९.३७ मिलिमीटर सरासरी पावसाची नोेंद नोंदविण्यात आली होती. यावर्षी वार्षिक सरासरीच्या १ जून ते २ जुलै दरम्यान पावसाची अवघी २८.७५ मि़मी़ इतकी नाममात्र नोंद झाली आहे.कापूस, मका घटणारपाऊस लांबल्याने खरिपात लागवड केलेली भुईमूग व तूर पिके जळाली असून, या पश्चिम भागातील भात व नागलीच्या पेरण्या उशिरा होण्याची शक्यता आहे. त्यातही तूर आणि भुईमूग पिके खरिपात लवकर पेरणी होत असल्याने ही पिके गेल्यात जमा आहेत. पाऊस लांबल्याने कापूस व मका या प्रमुख पिकांच्या क्षेत्रात मोठी घट होणार असून, बाजरीचे क्षेत्र त्यामुळे वाढणार आहे.