शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी दुबार पेरणी

By admin | Updated: July 10, 2017 00:04 IST

येवला : मृग संपून आर्द्रा नक्षत्रात पावसाने तुरळक हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : मृग संपून आर्द्रा नक्षत्रात पावसाने तुरळक हजेरी लावली. सध्या सुरू असलेल्या पुनर्वसू नक्षत्रात पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असून, शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे लागले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती असल्यामुळे शेतरक ऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. प्रारंभी थोडासा पाऊस पडला यामुळे बियांनी रोपे धरली. परंतु गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली तसेच रोज कडक ऊन पडत असल्यामुळे रोपे करपू लागली आहेत. रोहिण्यानंतर मृगाच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. गेल्या तीन आठवड्यांपासून येवला तालुक्यात पावसाने पूर्णत: उघडीप दिल्याने शेतात उगवलेली पिके जळू लागली आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मृग नक्षत्रातील पावसावर तालुक्यातील जवळपास संपूर्ण शेतकऱ्यांनी शेते तयार केली व ज्यांची शेते तयार होती त्यांनी कापूस, सोयाबीन, मका आदी पिकांची लागवड केली. मृगामध्ये तालुक्यात काही ठिकाणी वरुणराजाने दमदार सुरु वात केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांनी अक्षरश: कर्ज काढून बी-बियाणे आणि खतांची खरेदी केली; मात्र आता पावसानेच दडी मारल्याने शेतकरी चिंतित आहेत. गेल्या चार दिवसांपासून आभाळात केवळ ढगांची गर्दी, ऊन सावलीचा खेळ होत असला तरी पाऊस बेपत्ता आहे. आगामी चार दिवसांत पाऊस पडला नाही तर शेतातील पिके करपून दुबार पेरणीचे संकट ओढवणार असल्याचे चित्र तालुक्यात आहे. मागील आठवड्यात सूर्याचे दर्शन झाले नाही. सर्वत्र केवळ ढगाळ वातावरण होते. आता ढगही गायब झाले आहेत. सुसाट वारा सुटल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. शिवाय उतरून पडलेले मका, बाजरी, मूग पिके आता पिवळी पडू लागली आहेत. मका पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. पीकविमा घेण्याची तयारी अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. गेल्या तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्याला यंदा ऐन हंगामात पुन्हा वरुणराजाने वक्र दृष्टी केल्याने चिंता वाढली आहे; मात्र मृग आणि आर्द्रा नक्षत्रातील जेमतेम पावसावर खरीप पेरण्यांची कामे आटोपली होती. आता पाण्याअभावी पिके संकटात सापडली आहेत. पश्चिम भागात अद्यापही दमदार पर्जन्यवृष्टी झालेली नसल्याने विहिरींना पाणी उतरणे तर दूरच जमिनीची तहानदेखील भागलेली नाही. यंदा चांगला पाऊस होईल या अंदाजावर पुन्हा कर्ज काढून उभारी धरलेल्या शेतकऱ्याचे कंबरडे मोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चारा छावण्या तर येवला तालुक्याला मृगजळच ठरल्या आहेत. भीजपावसाने निर्माण झालेल्या हिरवळीवर सध्या जनावरे पोसली जात आहेत.