शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

नांदूरशिंगोटे परिसरातील पेरण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:10 IST

नांदूरशिंगोटे : येथे व परिसरात खरीप हंगामपूर्व शेतीच्या मशागतीची कामे आटोपली आहेत. आता वरुणराजाच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे. शेतकऱ्यांनी ...

नांदूरशिंगोटे : येथे व परिसरात खरीप हंगामपूर्व शेतीच्या मशागतीची कामे आटोपली आहेत. आता वरुणराजाच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे. शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खतांची जुळवाजुळव करून ठेवली असून, पाऊस लांबल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. परिसरातील काही ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या असून, काही भागात पेरण्यांना मुहूर्त लागलेला नाही. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने व यावर्षीदेखील भरपूर पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मान्सूनपर्व पावसाने परिसरात हजेरी लावली होती. त्यानंतर मृग नक्षत्रास प्रारंभ झाला. जिल्ह्यात ठिकठिकाणी मृग नक्षत्राचा समाधानकारक पाऊस पडत असताना परिसरातील काही भाग कोरडाठाक आहे. शेतकऱ्यांनी शिवार लागवडीसाठी तयार करून टंचाई होऊ नये म्हणून खताची तरतूददेखील करून ठेवली आहे. नांदूरशिंगोटे येथे व परिसरात शेतकरी प्रामुख्याने सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांची लागवड करतात. मान्सूनपूर्व सरी कोसळल्याने व मृग नक्षत्राच्या आगमनाची चाहूल लागताच गत आठवड्यात बियाणे खरेदीसाठी कृषी दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरात शेतमालाचा भाव पडला होता. अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आले होते. त्यातच बी-बियाणे व खतांच्या दरवाढीने शेतकरी हतबल झाला असून, दहा दिवसापासून मृग नक्षत्राने पाठ फिरवल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

-------------------

इन्फो... ढग जमा होतात अन् निघून जातात

नांदूरशिंगोटे परिसराला जून महिन्यात पावसाने चांगलीच हुलकावणी दिली असून, दिवसभर कडाक्याचे ऊन आणि सायंकाळी ढगांच्या गर्दीमुळे येथील शेतकरी चिंतित झाला आहे. ढग जमा होतात आणि निघून जातात, असे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे शेतीचा घसा आणखी किती दिवस कोरडा राहणार ते निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. इन्फो... पावसाची प्रतीक्षा तालुक्यातील दापूर व दोडी परिसरात मान्सूनपूर्व पावसाने मध्यंतरी जोरदार हजेरी लावली. परिसरातील काही भागात कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली. काही भागत चांगला पाऊस झाल्याने पेरणी आटोपली आहे. परंतु गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. जमिनीतील ओल कमी होऊ लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.