शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

नांदूरशिंगोटे परिसरातील पेरण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:10 IST

नांदूरशिंगोटे : येथे व परिसरात खरीप हंगामपूर्व शेतीच्या मशागतीची कामे आटोपली आहेत. आता वरुणराजाच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे. शेतकऱ्यांनी ...

नांदूरशिंगोटे : येथे व परिसरात खरीप हंगामपूर्व शेतीच्या मशागतीची कामे आटोपली आहेत. आता वरुणराजाच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे. शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खतांची जुळवाजुळव करून ठेवली असून, पाऊस लांबल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. परिसरातील काही ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या असून, काही भागात पेरण्यांना मुहूर्त लागलेला नाही. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने व यावर्षीदेखील भरपूर पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मान्सूनपर्व पावसाने परिसरात हजेरी लावली होती. त्यानंतर मृग नक्षत्रास प्रारंभ झाला. जिल्ह्यात ठिकठिकाणी मृग नक्षत्राचा समाधानकारक पाऊस पडत असताना परिसरातील काही भाग कोरडाठाक आहे. शेतकऱ्यांनी शिवार लागवडीसाठी तयार करून टंचाई होऊ नये म्हणून खताची तरतूददेखील करून ठेवली आहे. नांदूरशिंगोटे येथे व परिसरात शेतकरी प्रामुख्याने सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांची लागवड करतात. मान्सूनपूर्व सरी कोसळल्याने व मृग नक्षत्राच्या आगमनाची चाहूल लागताच गत आठवड्यात बियाणे खरेदीसाठी कृषी दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरात शेतमालाचा भाव पडला होता. अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आले होते. त्यातच बी-बियाणे व खतांच्या दरवाढीने शेतकरी हतबल झाला असून, दहा दिवसापासून मृग नक्षत्राने पाठ फिरवल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

-------------------

इन्फो... ढग जमा होतात अन् निघून जातात

नांदूरशिंगोटे परिसराला जून महिन्यात पावसाने चांगलीच हुलकावणी दिली असून, दिवसभर कडाक्याचे ऊन आणि सायंकाळी ढगांच्या गर्दीमुळे येथील शेतकरी चिंतित झाला आहे. ढग जमा होतात आणि निघून जातात, असे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे शेतीचा घसा आणखी किती दिवस कोरडा राहणार ते निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. इन्फो... पावसाची प्रतीक्षा तालुक्यातील दापूर व दोडी परिसरात मान्सूनपूर्व पावसाने मध्यंतरी जोरदार हजेरी लावली. परिसरातील काही भागात कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली. काही भागत चांगला पाऊस झाल्याने पेरणी आटोपली आहे. परंतु गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. जमिनीतील ओल कमी होऊ लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.