शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

जिल्ह्यातील पेरण्या ६० टक्क्यावर थांबल्या !

By श्याम बागुल | Updated: July 18, 2019 18:57 IST

यंदा मान्सूनचे आगमन उशिरा परंतु समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा खरीपाची पेरणी करण्याची मनोमन तयारी केली होती. परंतु पावसाचे आगमन खुपच लांबणीवर पडले.

ठळक मुद्देपाऊस न पडल्यास गंभीर परिस्थिती : दुबार पेरणीचे संकट एका आठवड्यात जेमतेत सात टक्केच पेरण्या होवू शकल्या

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जुनच्या अखेरीस व जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात जोरदार आगमन झालेल्या मान्सुनच्या भरवशावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांपुढे पावसाच्या दडीमुळे नवीन संकट उभे राहिले असून, याच पावसाचा आधार घेवून गेल्या आठवड्यापर्यंत जोमात असलेल्या खरीपाच्या पेरण्यांना ब्रेक लागला आहे. जिल्ह्यात जुलैच्या दुस-या आठवड्यापर्यंत जेमतेम ६० टक्केच पेरण्या होवू शकल्या आहेत. येत्या आठ दिवसात पावसाचे आगमन न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदा मान्सूनचे आगमन उशिरा परंतु समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा खरीपाची पेरणी करण्याची मनोमन तयारी केली होती. परंतु पावसाचे आगमन खुपच लांबणीवर पडले. त्यातही मान्सुनचे आगमन झाल्यावर पाहिजे त्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली नाही. मात्र आता पावसाचे आगमन झाल्याचे पाहून शोतक-यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून खरीपाच्या पेरण्यांना सुरूवात केली. अशातच ७ ते ९ जुलै दरम्यान पावसाने झोडपून काढल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या. पाऊस थांबताच पेरण्यांनी वेग घेतला. गेल्या आठवड्यापर्यंत ५३ टक्के पेरण्या झाल्या असताना अचानक पावसाने दडी मारल्यामुळे एका आठवड्यात जेमतेत सात टक्केच पेरण्या होवू शकल्या आहेत. मुळात एखाद दुस-या पावसाच्या भरवशावर जमिनीची पुरेशी ओल झालेली नसताना शेतक-यांनी पेरणी केल्यामुळे आता नेमके मोड येण्याच्या स्थितीतच पिकाला पाणी नसल्यामुळे त्याने तग धरण्यापुर्वीच माना टाकायला सुरूवात केली आहे. कृषी जाणकारांच्या मते शेतात किमान नऊ इंच जमीन ओली असताना केलेल्या पेरणीला पाऊस लांबल्याची फारशी भिती नाही. मात्र सध्याच्या पेरण्या ह्या निव्वळ तीन इंच जमीन ओली असल्याच्या भरवशावर करण्यात आल्यामुळे पिकांना सद्यस्थितीत पावसाची प्रचंड गरज आहे. मात्र पाऊस पडण्याऐवजी उन्हाळ्यासारखी उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे आणखी आठ दिवस पाऊस न झाल्यास पिकांची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, त्यानंतर मात्र शेतक-यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद