शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

जिल्ह्यातील पेरण्या ६० टक्क्यावर थांबल्या !

By श्याम बागुल | Updated: July 18, 2019 18:57 IST

यंदा मान्सूनचे आगमन उशिरा परंतु समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा खरीपाची पेरणी करण्याची मनोमन तयारी केली होती. परंतु पावसाचे आगमन खुपच लांबणीवर पडले.

ठळक मुद्देपाऊस न पडल्यास गंभीर परिस्थिती : दुबार पेरणीचे संकट एका आठवड्यात जेमतेत सात टक्केच पेरण्या होवू शकल्या

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जुनच्या अखेरीस व जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात जोरदार आगमन झालेल्या मान्सुनच्या भरवशावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांपुढे पावसाच्या दडीमुळे नवीन संकट उभे राहिले असून, याच पावसाचा आधार घेवून गेल्या आठवड्यापर्यंत जोमात असलेल्या खरीपाच्या पेरण्यांना ब्रेक लागला आहे. जिल्ह्यात जुलैच्या दुस-या आठवड्यापर्यंत जेमतेम ६० टक्केच पेरण्या होवू शकल्या आहेत. येत्या आठ दिवसात पावसाचे आगमन न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदा मान्सूनचे आगमन उशिरा परंतु समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा खरीपाची पेरणी करण्याची मनोमन तयारी केली होती. परंतु पावसाचे आगमन खुपच लांबणीवर पडले. त्यातही मान्सुनचे आगमन झाल्यावर पाहिजे त्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली नाही. मात्र आता पावसाचे आगमन झाल्याचे पाहून शोतक-यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून खरीपाच्या पेरण्यांना सुरूवात केली. अशातच ७ ते ९ जुलै दरम्यान पावसाने झोडपून काढल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या. पाऊस थांबताच पेरण्यांनी वेग घेतला. गेल्या आठवड्यापर्यंत ५३ टक्के पेरण्या झाल्या असताना अचानक पावसाने दडी मारल्यामुळे एका आठवड्यात जेमतेत सात टक्केच पेरण्या होवू शकल्या आहेत. मुळात एखाद दुस-या पावसाच्या भरवशावर जमिनीची पुरेशी ओल झालेली नसताना शेतक-यांनी पेरणी केल्यामुळे आता नेमके मोड येण्याच्या स्थितीतच पिकाला पाणी नसल्यामुळे त्याने तग धरण्यापुर्वीच माना टाकायला सुरूवात केली आहे. कृषी जाणकारांच्या मते शेतात किमान नऊ इंच जमीन ओली असताना केलेल्या पेरणीला पाऊस लांबल्याची फारशी भिती नाही. मात्र सध्याच्या पेरण्या ह्या निव्वळ तीन इंच जमीन ओली असल्याच्या भरवशावर करण्यात आल्यामुळे पिकांना सद्यस्थितीत पावसाची प्रचंड गरज आहे. मात्र पाऊस पडण्याऐवजी उन्हाळ्यासारखी उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे आणखी आठ दिवस पाऊस न झाल्यास पिकांची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, त्यानंतर मात्र शेतक-यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद