शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

जिल्ह्यातील पेरण्या ६० टक्क्यावर थांबल्या !

By श्याम बागुल | Updated: July 18, 2019 18:57 IST

यंदा मान्सूनचे आगमन उशिरा परंतु समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा खरीपाची पेरणी करण्याची मनोमन तयारी केली होती. परंतु पावसाचे आगमन खुपच लांबणीवर पडले.

ठळक मुद्देपाऊस न पडल्यास गंभीर परिस्थिती : दुबार पेरणीचे संकट एका आठवड्यात जेमतेत सात टक्केच पेरण्या होवू शकल्या

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जुनच्या अखेरीस व जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात जोरदार आगमन झालेल्या मान्सुनच्या भरवशावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांपुढे पावसाच्या दडीमुळे नवीन संकट उभे राहिले असून, याच पावसाचा आधार घेवून गेल्या आठवड्यापर्यंत जोमात असलेल्या खरीपाच्या पेरण्यांना ब्रेक लागला आहे. जिल्ह्यात जुलैच्या दुस-या आठवड्यापर्यंत जेमतेम ६० टक्केच पेरण्या होवू शकल्या आहेत. येत्या आठ दिवसात पावसाचे आगमन न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदा मान्सूनचे आगमन उशिरा परंतु समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा खरीपाची पेरणी करण्याची मनोमन तयारी केली होती. परंतु पावसाचे आगमन खुपच लांबणीवर पडले. त्यातही मान्सुनचे आगमन झाल्यावर पाहिजे त्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली नाही. मात्र आता पावसाचे आगमन झाल्याचे पाहून शोतक-यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून खरीपाच्या पेरण्यांना सुरूवात केली. अशातच ७ ते ९ जुलै दरम्यान पावसाने झोडपून काढल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या. पाऊस थांबताच पेरण्यांनी वेग घेतला. गेल्या आठवड्यापर्यंत ५३ टक्के पेरण्या झाल्या असताना अचानक पावसाने दडी मारल्यामुळे एका आठवड्यात जेमतेत सात टक्केच पेरण्या होवू शकल्या आहेत. मुळात एखाद दुस-या पावसाच्या भरवशावर जमिनीची पुरेशी ओल झालेली नसताना शेतक-यांनी पेरणी केल्यामुळे आता नेमके मोड येण्याच्या स्थितीतच पिकाला पाणी नसल्यामुळे त्याने तग धरण्यापुर्वीच माना टाकायला सुरूवात केली आहे. कृषी जाणकारांच्या मते शेतात किमान नऊ इंच जमीन ओली असताना केलेल्या पेरणीला पाऊस लांबल्याची फारशी भिती नाही. मात्र सध्याच्या पेरण्या ह्या निव्वळ तीन इंच जमीन ओली असल्याच्या भरवशावर करण्यात आल्यामुळे पिकांना सद्यस्थितीत पावसाची प्रचंड गरज आहे. मात्र पाऊस पडण्याऐवजी उन्हाळ्यासारखी उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे आणखी आठ दिवस पाऊस न झाल्यास पिकांची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, त्यानंतर मात्र शेतक-यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद