शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉक होताच अपघात विभागात वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:18 IST

अपघातांच्या प्रमाणात वाढ होण्यामागे सर्वाधिक मोठे कारण अती घाई हेच ठरलेले आहे. विशेषत्वे दुचाकी चालकांबाबत तर शहराच्या परिघात तसेच ...

अपघातांच्या प्रमाणात वाढ होण्यामागे सर्वाधिक मोठे कारण अती घाई हेच ठरलेले आहे. विशेषत्वे दुचाकी चालकांबाबत तर शहराच्या परिघात तसेच महामार्गांवरुन जातानाही वेग आणि अती घाईच अपघातास कारणीभूत ठरली आहे. त्याशिवाय चारचाकी वाहने ही पावसाळ्यात व्हिजिबिलिटी चांगली नसल्याने कुणाचे वायपर बंद पडल्याने तर काहींची चाके स्कीड झाल्याने घसरल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याशिवाय निर्धारित ठिकाणी किंवा कार्यालयात पोहोचण्यास घरातून किंवा कार्यालयातूनच निघण्यास उशीर झाल्याने वेळेवर पोहोचण्यासाठीच्या कसरतीत अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

इन्फो

दारुची उपलब्धता देखील कारण

जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध लागू असताना दारु दुकाने देखील प्रदीर्घ काळ बंद होती. त्यामुळे दारु मिळण्याचे स्त्रोतच आटले होते. तर काही जण तशाही परिस्थितीत दारु मिळवत असले तरी दारुची उपलब्धता कमी असल्याने दारु पिण्याचे प्रमाण देखील कमी होते.

निर्बंध शिथिल झाल्यानंतर मात्र दारु बाजांना मुबलक दारु उपलब्ध झाली. काहींनी तर पुढील महिना, दोन महिने पुरेल असा स्टॉक करुन घेतल्याने दारु पिण्याचे प्रमाणदेखील वाढले असल्याने एकूणातच वाहनचालकांच्या अपघातात या दारु सेवनाचाही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.