शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शिरसोंडीच्या शेतकऱ्याचा मुलगा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:19 IST

मालेगाव : तालुक्यातील शिरसोंडी येथील शेतकरी केवळ उत्तम पवार यांनी सोसायटीच्या कर्जाला कंटाळून २०१५मध्ये आत्महत्या केली. आधीच पत्नी वारलेली. ...

मालेगाव : तालुक्यातील शिरसोंडी येथील शेतकरी केवळ उत्तम पवार यांनी सोसायटीच्या कर्जाला कंटाळून २०१५मध्ये आत्महत्या केली. आधीच पत्नी वारलेली. त्यामुळे त्यांच्या पश्चात मुलगा वाऱ्यावर पडला असून, उदरनिर्वाहासाठी नाशकात नोकरी शोधत आपली उपजीविका भागवत आहे. दोन बहिणींचे लग्न झालेले आहे. घरात दोनच जण असताना वडील केवळ पवार यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. त्यामुळे मुलगा दीपक पवार एकटा पडला. त्यातून तो कसाबसा सावरला असून, नाशकात काम धंदा शोधत आज एका मेडिकल एजन्सीत दहा हजार रुपयांची नोकरी करून गुजराण करीत आहे.

वडिलांनी आत्महत्या केली त्यावेळी दीपक अवघा सोळा वर्षांचा होता. दहावीत शिक्षण घेणारा दीपक वडील गेल्याने एकाकी पडला. त्याला राज्य शासनाकडून एक लाख रुपयांची मदत मिळाली. कृषिमंत्री दादा भुसे यांनी दहा हजारांची, तर नाम संस्थेनेही पंधरा हजारांची मदत केली. चांदवडमधूनही दहा हजारांची मदत झाली. त्यामुळे काही दिवस कसेबसे गेले; परंतु पुढे संपूर्ण आयुष्य उभे होते. घरी केवळ २० गुंठे शेतजमीन. वडिलांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली त्यांनतर आता जीवन जगण्याचे आव्हान समोर उभे होते. त्याचे मेहुणे मेडिकल एजन्सीत काम करीत होते. त्यांनी नाशिकच्या गोळे कॉलनीत असलेल्या मेडिकल एजन्सीत काम मिळवून दिले.

कोट....

कसाबसा उदरनिर्वाह चालवतो आहे. आता मेडिकल दुकानात काम करतो. तेथे दहा हजार रुपये महिना मानधन मिळते. अजून लग्न झालेले नाही. त्यामुळे एकट्याचा खर्च भागतो; पण लग्न झाल्यावर संसाराचा गाडा ओढावा लागणार आहे. शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय नोकरी मिळवून द्यावी.

- दीपक पवार, शिरसोंडी, ता. मालेगाव

फोटो- ०९ दीपक पवार