शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

राज्यातील काही टोलनाके बंद

By admin | Updated: June 1, 2015 01:18 IST

राज्यातील काही टोलनाके बंद

नाशिक : राज्य सरकारने राज्यातील काही टोलनाके बंद केले; मात्र याबाबत अद्यापही पारदर्शकता नाही. मोठ्या रस्त्यांवरील टोल बंद होणे अपेक्षित होते, शिवाय कमी खर्चाच्या लहान रस्त्याला टोल लावताच कामा नये. सरकारने जरी काही टोलनाक्यांवरील ‘वसुली’ थांबविली असली, तरी या टोलमुक्तीबाबत समाधानी नसल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यावर बोलून दाखविले. टोलमुक्त महाराष्ट्रासाठी ‘मनसे’ने छेडलेले आंदोलन विसरून चालणार नाही, असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. राज्य शासनाने सोमवार (दि.१) पासून राज्यातील बारा टोलनाके पूर्णपणे बंद करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने काढला आहे. तसेच ५३ नाक्यांवर कार, जीप आणि एस.टी. बसेसना सूट दिली जावी, अशी सूचना शासनाने केली आहे. या माध्यमातून महाराष्ट्र टोलमुक्त करण्याच्या दिशेने राज्य सरकारचे हे पहिले पाऊल आहे. शासनाच्या या निर्णयाबाबत पत्रकारांनी ठाकरे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘मनसे’ने महाराष्ट्र टोलमुक्त करण्यासाठी राज्यभर आंदोलने केली, कार्यकर्त्यांना पोलिसांच्या लाठ्या-काठ्यांचा मार खाऊन तुरुंगात जावे लागले व अनेकांवर खटले भरले गेले. त्यामुळे मनसेचा ‘टोल’ला ‘टोला’ आंदोलन महाराष्ट्र विसरू शकत नाही. शासनाने बारा टोलनाके बंद केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन; मात्र टोलमुक्त महाराष्ट्रासाठी सरकारने केलेला हा प्रयत्न पाहिजे तसा भरीव नसून, याबाबत आपण समाधानी नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या रस्त्यांच्या बांधकामासाठी अत्यंत कमी खर्च आला त्या रस्त्यांवर टोलनाके हवेत कशाला, हाच प्रश्न ‘मनसे’चा आहे. या आग्रही मागणीसाठी आम्ही आंदोलने केली, असे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. टोलनाके शासनाने पारदर्शक करावे. तेथील कॅश पेमेंटची प्रक्रिया बंद करावी आणि सर्वाधिक होणारी टोलनाक्यांवरील पैशांची उधळण थांबवावी, हीच प्रमुख मागणी असल्याचे ठाकरे म्हणाले. टोलमधून होणाऱ्या रोखीच्या व्यवहारांची टक्केवारी अनाकलनीय असल्याचे सांगत, या माध्यमातून कोणाला किती ‘उत्पन्न’ मिळते अन् सरकारच्या तिजोरीत काय जाते, याबाबत शंकाच आहे. टोलचे रोखीचे व्यवहार बंद होत नाही तोपर्यंत समाधानी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)