शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

राज्यातील काही टोलनाके बंद

By admin | Updated: June 1, 2015 01:18 IST

राज्यातील काही टोलनाके बंद

नाशिक : राज्य सरकारने राज्यातील काही टोलनाके बंद केले; मात्र याबाबत अद्यापही पारदर्शकता नाही. मोठ्या रस्त्यांवरील टोल बंद होणे अपेक्षित होते, शिवाय कमी खर्चाच्या लहान रस्त्याला टोल लावताच कामा नये. सरकारने जरी काही टोलनाक्यांवरील ‘वसुली’ थांबविली असली, तरी या टोलमुक्तीबाबत समाधानी नसल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यावर बोलून दाखविले. टोलमुक्त महाराष्ट्रासाठी ‘मनसे’ने छेडलेले आंदोलन विसरून चालणार नाही, असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. राज्य शासनाने सोमवार (दि.१) पासून राज्यातील बारा टोलनाके पूर्णपणे बंद करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने काढला आहे. तसेच ५३ नाक्यांवर कार, जीप आणि एस.टी. बसेसना सूट दिली जावी, अशी सूचना शासनाने केली आहे. या माध्यमातून महाराष्ट्र टोलमुक्त करण्याच्या दिशेने राज्य सरकारचे हे पहिले पाऊल आहे. शासनाच्या या निर्णयाबाबत पत्रकारांनी ठाकरे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘मनसे’ने महाराष्ट्र टोलमुक्त करण्यासाठी राज्यभर आंदोलने केली, कार्यकर्त्यांना पोलिसांच्या लाठ्या-काठ्यांचा मार खाऊन तुरुंगात जावे लागले व अनेकांवर खटले भरले गेले. त्यामुळे मनसेचा ‘टोल’ला ‘टोला’ आंदोलन महाराष्ट्र विसरू शकत नाही. शासनाने बारा टोलनाके बंद केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन; मात्र टोलमुक्त महाराष्ट्रासाठी सरकारने केलेला हा प्रयत्न पाहिजे तसा भरीव नसून, याबाबत आपण समाधानी नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या रस्त्यांच्या बांधकामासाठी अत्यंत कमी खर्च आला त्या रस्त्यांवर टोलनाके हवेत कशाला, हाच प्रश्न ‘मनसे’चा आहे. या आग्रही मागणीसाठी आम्ही आंदोलने केली, असे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. टोलनाके शासनाने पारदर्शक करावे. तेथील कॅश पेमेंटची प्रक्रिया बंद करावी आणि सर्वाधिक होणारी टोलनाक्यांवरील पैशांची उधळण थांबवावी, हीच प्रमुख मागणी असल्याचे ठाकरे म्हणाले. टोलमधून होणाऱ्या रोखीच्या व्यवहारांची टक्केवारी अनाकलनीय असल्याचे सांगत, या माध्यमातून कोणाला किती ‘उत्पन्न’ मिळते अन् सरकारच्या तिजोरीत काय जाते, याबाबत शंकाच आहे. टोलचे रोखीचे व्यवहार बंद होत नाही तोपर्यंत समाधानी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)