शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

काही निर्णय गरजेनुसार घेतले जातात : भंडारी

By admin | Updated: January 26, 2017 00:46 IST

गुन्हेगार उमेदवारांच्या प्रवेशाबाबत वादग्रस्त वक्तव्य

नाशिक : काही निर्णय गरजेनुसार स्थानिक पातळीवर घेतले जातात. त्याची प्रदेशपातळीवर पक्षाला कल्पना असतेच असे नाही; मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना प्रवेश आणि तिकीट देण्याबाबत पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेईल. नैतिकतेच्या विचारावरच याबाबत अंतिम निर्णय होईल, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी नाशिकला पत्रकार परिषदेत केले. नाशिकला सुरू असलेल्या पदवीधर निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी भाजपा प्रदेशचे प्रवक्ते माधव भंडारी, केशव उपाध्याय नाशिकला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभा, विधानसभेत भाजपाला विकासाच्या मुद्द्यावर बहुमत मिळाले असून, आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांमध्येही भाजपाचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा विकासच असेल, असे भंडारी यांनी सांगितले. जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. १० पैकी नऊ महापालिकेत भाजपाचा महापौर होऊ शकतो. तिच परिस्थिती जिल्हा परिषदांमध्ये असेल, असे त्यांनी सांगितले. २०१२ च्या तुलनेत नगरपंचायतींमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले. २०१२ मध्ये भाजपाचे ७ नगराध्यक्ष व ४ उपनगराध्यक्ष तसेच ३५० अधिक नगरसेवक होते. २०१७ च्या निवडणुकीत मात्र भाजपाचे अधिकृत ८० नगराध्यक्ष तसेच ११५० नगरसेवक निवडून आले आहेत. हीच परिस्थिती आता महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राहील, असे त्यांनी सांगितले. शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी पक्ष यांच्यासोबत युती करण्याबाबत चर्चा सुरू आहे; मात्र अद्याप युती झालेली नाही. युती झाली नाही तरी भाजपाने स्वबळावर सर्व ठिकाणी लढण्याची तयारी पूर्ण केली आहे. नाशिकला तर यापूर्वीच स्वबळावर लढण्याचे संकेत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिले असल्याचे सांगितले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागुल, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, सुहास  फरांदे, सुरेश पाटील, हेमंत धात्रक, लक्ष्मण सावजी आदि उपस्थित  होते. (प्रतिनिधी)