शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

हरणबारीचे आवर्तन सुटल्याने समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:38 IST

मालेगाव : महिनाभरापासून बागलाण व मालेगाव तालुक्यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देहरणबारी आवर्तन सुटल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

मालेगाव : महिनाभरापासून बागलाण व मालेगाव तालुक्यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर पर्याय म्हणून हरणबारीचे आवर्तन सोडण्याची मागणी दोन्ही तालुक्यातील जनता करीत होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठविल्याने शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी धरणाचा जॅकवेल खोलून सुमारे ५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. एकूण पाण्यापैकी ३५० दलघफू. पाणी पिण्यासाठी नदीपात्रात सोडण्यात येणार असून, किमान १८ तारखेपर्यंत नदीपात्रात पाणी सोडले जाईल. तसेच सदर पाणी मालेगाव शहराजवळील वैतागवाडी धरणापर्यंत पोहोच केले जाणार आहे. हे पाणी केवळ पिण्यासाठी असून शेतीला वापर करू नये, आवर्तन काळात शेती पंप बंद ठेवावेत तसेच अवैधरीत्या पाण्याची नासाडी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारासुद्धा पाटबंधारे खात्याने दिला आहे. मालेगाव तालुक्यातील नदीकाठावरील गावांना पाणी पोहोच करण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करण्याचे आवाहन हरणबारी सिंचन अभियंता आर. बी. सूर्यवंशी, पोलीस अधिकारी गणेश गुरव यांनी केले आहे. या आवर्तनामुळे बागलाणसह मालेगाव तालुक्यातील जनतेला तीव्र पाणीटंचाईपासून तूर्त दिलासा मिळाला आहे. हरणबारी आवर्तन सुटल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.