शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शंभर गावांचा पाणीपुरवठा सुरळीत

By admin | Updated: December 10, 2015 00:01 IST

तोडगा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचा संप मागे

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील सुमारे शंभरहून अधिक गावांचा बंद करण्यात आलेला पाणीपुरवठा काल (दि. ९) सुरळीत सुरू झाला. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मंगळवारी रात्री उशिरा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी संघटना संयुक्त समितीने बेमुदत संप मागे घेतला.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सोमवारपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीच्या वतीने जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या आवारात दोन दिवसांपासून बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले होते. या बेमुदत संपामुळे मालेगाव तालुक्यातील ५०, चांदवड तालुक्यातील ५०, सिन्नर तालुक्यातील पाच, ओझर साकोरे तीन गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अशा १०८ गावांचा, तसेच इगतपुरी शहर पाणीपुरवठा योजना व ओझर येथील संरक्षण केंद्र पाणीपुरवठा योजना या दोन शहरी अशा एकूण ११० योजनांचा पाणीपुरवठा या बेमुदत संपामुळे रविवारी मध्यरात्रीपासून खंडित झाल्याने शंभरहून अधिक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे शासनात विलीनीकरण करून विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन व निर्वाह भत्ते सरकारने (पान ७ वर)करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीच्या वतीने हे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या धोरणानुसार पाणीपुरवठा व जलनिस्सारण योजनांवरील प्रत्यक्ष खर्चाच्या अनुषंगाने आस्थापना, हत्यारे व अवजारे यांच्या खर्चापोटी १७.५ टक्के इतके ई अ‍ॅन्ड पी शुल्क आकारणे अनिवार्य असून, ते मजीप्राच्या उत्पन्नाशी निगडित आहे. या शुल्कातून मजीप्राच्या कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यापोटीचा खर्च भागविला जातो. कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्याच्या खर्चासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान दिले जात नाही. २२ फेब्रुवारी २०११ च्या शासन निर्णयानुसार ई अ‍ॅन्ड पी शुल्क १७.५ टक्के ऐवजी ५ ते ९ टक्केपर्यंत कमी करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व निवृत्तीवेतनाचा खर्च कसा भागवावा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर अधिवेशनानंतर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटनेला दिल्याने बेमुदत संप मागे घेण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)