शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

जिल्ह्यातील ५९ शेतकऱ्यांना सौर कृषिपंप

By admin | Updated: April 10, 2017 01:40 IST

नाशिक : महावितरणने सुरू केलेल्या सौर कृषिपंप योजनेला चांगला प्रतिसाद लाभला असून, जिल्ह्यातील ५९ शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेचा वापर सुरू केला आहे.

 नाशिक : ज्यांच्यापर्यंत अद्याप वीज पोहचलेली नाही अशा शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेवर कृषिपंप चालवावे यासाठी महावितरणने सुरू केलेल्या सौर कृषिपंप योजनेला चांगला प्रतिसाद लाभला असून, जिल्ह्यातील ५९ शेतकऱ्यांनी विजेवर अवलंबून न राहता सौर ऊर्जेचा वापर सुरू केला आहे. सौर कृषिपंप योजनेला नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, आतापर्यंत ५९ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत सौर पंपावर सिंचन करण्यास सुरु वात केली आहे. यात सर्वाधिक १३ शेतकरी सिन्नर तालुक्यातील आहेत. ज्यांच्या शेतात आतापर्यंत वीज पोहचू शकली नाही, अशा शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य सरकार ही योजना राबवित आहे.पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनाही सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने सौर कृषिपंप योजना सुरू केली. अतिदुर्गम भाग, कोटेशन भरूनही तांत्रिक कारणामुळे तसेच वन विभागाकडून ना हरकत मिळत नसल्याने वीजजोडणी न मिळणे कठीण होते. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती ही त्यांच्याकडे आलेल्या अर्जामधून पात्रता व प्राधान्यक्र मानुसार लाभार्थ्यांची निवड करीत असते.गेल्या आर्थिक वर्षात सौर कृषिपंप योजनेतून नाशिक जिल्ह्यातील १३० लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या योजनेत सहभागी होण्यासाठी ऐकून २०३ जणांनी अर्ज केले. जिल्हास्तरीय समितीने यातील १३० लाभार्थ्यांची निवड केली. निवड झालेल्या लाभार्थ्यांपैकी ७९ जणांनी त्यांचा लाभार्थी हिस्सा जमा केला. त्यानुसार ७९ सौर कृषिपंपाची मागणी नोंदवण्यात आली. यातील ५९ शेतकऱ्यांच्या शेतात सध्या या योजनेतून सौर कृषिपंप बसवण्यात आले असून, सिंचनासाठी त्यांचा वापरही सुरू झाला आहे. तालुकानिहाय या योजनेतून सध्या कार्यरत सौरपंपांची संख्या - देवळा - ५, चांदवड - ५, नांदगाव - २, येवला - ६, इगतपुरी -४ सिन्नर - १३, पेठ- ४, सुरगणा- १०, त्र्यंबक- ६, निफाड- ४, मालेगाव- १ याप्रमाणे आहे. मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी सौर कृषिपंपाची नुकतीच पाहणी केली. यावेळी नाशिक शहर मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता अभिमन्यू चव्हाण, उप कार्यकारी अभियंता डॉ. नीलेश रोहणकर, कनिष्ठ अभियंता राहुल शिंदे आदि उपस्थित होते.