शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जा उपयुक्त

By admin | Updated: November 4, 2015 22:43 IST

रामचंद्र भोगले : चेंबरतर्फे आयोजित कार्यशाळेत प्रतिपादन

नाशिक : दिवसेंदिवस विजेचा वापर वाढत असून, त्या तुलनेत विजेची निर्मिती होत नसल्याने मागणी व पुरवठा यांचा समन्वय साधला जात नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचा आणि पंपाचा वापर सोयीचा आणि वरदान ठरू शकेल, असे मत महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष रामचंद्र भोगले यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर यांच्या वतीने अशोका सभागृहात सौरपंप आणि पी. व्ही. पॅनल याविषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. खासदार हेमंत गोडसे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता बी. जी. जाधव, एम.एस.ई.डी.सी.एल.चे मुख्य अभियंता व्ही. बी. बढे, चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, चेंबरच्या अपारंपरिक ऊर्जा समितीचे अध्यक्ष यू. के. शर्मा आणि उपाध्यक्ष विलास शिरोरे यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात विजेची बचत होऊ शकते. हीच वीज अन्यत्र वापरली जाईल. विजेचे दर वाढले की त्याचा थेट परिणाम उद्योजकांवर होत असतो. शेतकऱ्यांना देण्यात येणारी वीज बिल माफी किंवा वीज बिलातील सवलत भरून काढण्यासाठी उद्योजकांवरच अधिभार लावला जातो. त्यामुळे उद्योजकांना महाग दराने वीज घ्यावी लागते. त्यामुळे यावर मात करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर वाढला पाहिजे, असेही भोगले म्हणाले. विलास शिरोरे यांनी प्रास्ताविक, तर निता आरोरा यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ममता पाटील, अश्विनी बोरस्ते, योगीता अहेर, तसेच चेंबरचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)