शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

येवल्यात सामाजिक वनीकरण विभागाने केली १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 19:42 IST

येवला : तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यात करंज, रेनट्री, निम, आवळा, चिंच, वड, पिंपळ, हादगा, शेवगा, जांभूळ, सिल्वर, ओक, विलायती चिंच, सिताफळ, आधी वृक्षांची लागवड झाली आहे. सदर वृक्ष खिर्डी साठे व राजापूर येथील शासकीय रोप रोपवाटिकेतून वृक्ष आणण्यात आले आहे.

ठळक मुद्देबावन ग्रामपंचायतीना एक लाख ६६ हजार वृक्ष देण्यात आले.

येवला : तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.यात करंज, रेनट्री, निम, आवळा, चिंच, वड, पिंपळ, हादगा, शेवगा, जांभूळ, सिल्वर, ओक, विलायती चिंच, सिताफळ, आधी वृक्षांची लागवड झाली आहे. सदर वृक्ष खिर्डी साठे व राजापूर येथील शासकीय रोप रोपवाटिकेतून वृक्ष आणण्यात आले आहे.कोटमगाव येथे आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते तर पांजरवाडी येथे आमदार नरेंद्र दराडे यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली. भारम येथे वृक्ष लागवड पंचायत समिती सदस्य लक्ष्मीबाई गरु ड यांच्या हस्त, अंकाई येथे डॉ. सुधीर जाधव यांच्या हस्ते झाले. या वृक्षांची देखरेख तीन वर्षांपर्यंत करणे. कुंपण, पाणी, संरक्षण तेथील व सुरक्षतेसाठी सर्व उपाय योजना करण्यात येतात. त्यासाठी सदर वृक्षांची देखभाल करण्यासाठी या ठिकाणी वन मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी सामाजिक वनीकरण विभागाने येवला तालुक्यातील बावन ग्रामपंचायतीना एक लाख ६६ हजार वृक्ष देण्यात आले.महाराष्ट्र राज्य योजनेअंतर्गत महत्वाचे रस्ते, कालवे, रेल्वे महामार्ग आदी बाजूला वृक्षांची लागवड करण्यात येते. या योजनेतून सदरचा खर्च भागविण्यात येतो. गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना खिर्डीसाठे येथील रोपवाटिकेत कोपरगाव येथून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.नाशिक वन विभागाकरिता ८८ लाख, सामाजिक वनीकरण २५ लाख, वन विकास महामंडळ १४ लाख ३४ हजार, ग्रामपंचायत विभाग ४२ लाख २३ हजार वृक्षांची उद्दिष्टे देण्यात आली होती. येवला तालुक्यात सामाजिक वनीकरण विभाग एक लाख ९७ हजार वृक्षांची लागवड जुलै अखेर करावयाची आहे. त्यापैकी १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.पांजरवाडी गट लागवड १० हजार, भारम २५ हजार, बाभूळगाव ते पाटोदा रस्ता ५ हजार, सावरगाव ते येवला ५ हजार,कोटमगाव ते गवंडगाव ५ हजार, अंगणगाव ते देशमाने ५ हजार, नगरसुल ते धामोडे ३ हजार, कौठ खेडे ते नागडे ५ हजार, नगरसुल ते ममदापुर ५ हजार, कौठ खेडे ते भारम रहाडी पर्यंत ५ हजार, वाई बोथी ते अंदरसुल ५ हजार, नगरसुल ते खिडीसाठे २ हजार, सावरगाव ते पाटोदा ५ हजार, वाई बोथी ते न्याहारखेडा एक हजार, या प्रमाणे रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.