शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

येवल्यात सामाजिक वनीकरण विभागाने केली १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 19:42 IST

येवला : तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यात करंज, रेनट्री, निम, आवळा, चिंच, वड, पिंपळ, हादगा, शेवगा, जांभूळ, सिल्वर, ओक, विलायती चिंच, सिताफळ, आधी वृक्षांची लागवड झाली आहे. सदर वृक्ष खिर्डी साठे व राजापूर येथील शासकीय रोप रोपवाटिकेतून वृक्ष आणण्यात आले आहे.

ठळक मुद्देबावन ग्रामपंचायतीना एक लाख ६६ हजार वृक्ष देण्यात आले.

येवला : तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.यात करंज, रेनट्री, निम, आवळा, चिंच, वड, पिंपळ, हादगा, शेवगा, जांभूळ, सिल्वर, ओक, विलायती चिंच, सिताफळ, आधी वृक्षांची लागवड झाली आहे. सदर वृक्ष खिर्डी साठे व राजापूर येथील शासकीय रोप रोपवाटिकेतून वृक्ष आणण्यात आले आहे.कोटमगाव येथे आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते तर पांजरवाडी येथे आमदार नरेंद्र दराडे यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली. भारम येथे वृक्ष लागवड पंचायत समिती सदस्य लक्ष्मीबाई गरु ड यांच्या हस्त, अंकाई येथे डॉ. सुधीर जाधव यांच्या हस्ते झाले. या वृक्षांची देखरेख तीन वर्षांपर्यंत करणे. कुंपण, पाणी, संरक्षण तेथील व सुरक्षतेसाठी सर्व उपाय योजना करण्यात येतात. त्यासाठी सदर वृक्षांची देखभाल करण्यासाठी या ठिकाणी वन मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी सामाजिक वनीकरण विभागाने येवला तालुक्यातील बावन ग्रामपंचायतीना एक लाख ६६ हजार वृक्ष देण्यात आले.महाराष्ट्र राज्य योजनेअंतर्गत महत्वाचे रस्ते, कालवे, रेल्वे महामार्ग आदी बाजूला वृक्षांची लागवड करण्यात येते. या योजनेतून सदरचा खर्च भागविण्यात येतो. गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना खिर्डीसाठे येथील रोपवाटिकेत कोपरगाव येथून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.नाशिक वन विभागाकरिता ८८ लाख, सामाजिक वनीकरण २५ लाख, वन विकास महामंडळ १४ लाख ३४ हजार, ग्रामपंचायत विभाग ४२ लाख २३ हजार वृक्षांची उद्दिष्टे देण्यात आली होती. येवला तालुक्यात सामाजिक वनीकरण विभाग एक लाख ९७ हजार वृक्षांची लागवड जुलै अखेर करावयाची आहे. त्यापैकी १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.पांजरवाडी गट लागवड १० हजार, भारम २५ हजार, बाभूळगाव ते पाटोदा रस्ता ५ हजार, सावरगाव ते येवला ५ हजार,कोटमगाव ते गवंडगाव ५ हजार, अंगणगाव ते देशमाने ५ हजार, नगरसुल ते धामोडे ३ हजार, कौठ खेडे ते नागडे ५ हजार, नगरसुल ते ममदापुर ५ हजार, कौठ खेडे ते भारम रहाडी पर्यंत ५ हजार, वाई बोथी ते अंदरसुल ५ हजार, नगरसुल ते खिडीसाठे २ हजार, सावरगाव ते पाटोदा ५ हजार, वाई बोथी ते न्याहारखेडा एक हजार, या प्रमाणे रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.