शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

... तर सरकारला सहकार्य करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:14 IST

सिटू भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना डॉ.कराड यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या बारा दिवसाच्या लॉकडाऊन काळातील ...

सिटू भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना डॉ.कराड यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या बारा दिवसाच्या लॉकडाऊन काळातील वेतन देण्यास अनेक उद्योग तयार नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा उद्योगांना पूर्ण वेतन देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनावरील उपचारासाठी लोकांना कर्जबाजारी व्हावे लागले आहे. दिवाळे निघाले आहे.अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहेत. म्हणून सर्वांचा मग तो कामगार असो वा व्यावसायिक ५० लाख रुपयांचे विम्याचे सुरक्षा कवच मिळाले पाहिजे. दुसऱ्या लाटेत सरकारला संपूर्ण सहकार्य केले आहे. मात्र तिसऱ्या लाटेसाठी सरकारने पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. एक रुपयाही खर्च न करता वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे. अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही. कोणतेही सहकार्य केले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. प्राप्तीकर लागू नसलेल्या नागरिकांच्या खात्यावर ७५०० रुपये जमा करावेत. केरळ सरकारच्या धरतीवर लॉकडाऊनच्या काळातील सर्व नागरिकांचे वीजबिल, पाणीबिल माफ करण्यात यावे. सातपूर, अंबड, सिन्नर माळेगाव, मुसळगाव, दिंडोरी, पिंपळगाव औद्योगिक वसाहतीत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करून कामगारांचे मोफत लसीकरण करण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. यावेळी सीताराम ठोंबरे, कल्पना शिंदे, तुकाराम सोनजे, संतोष काकडे, मोहन जाधव आदी उपस्थित होते.