शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

‘भेटकार्ड’पुढे एसएमएस पडले फिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:53 IST

संपर्क साधनांचे अनेक आधुनिक पर्याय उपलब्ध असल्याने टपालाच्या माध्यमातून दिवाळीचे शुभेच्छा संदेश पाठविणे कालबाह्य झाल्याची चर्चा होत असताना आधुनिक साधनांचा वापर करणाºयांनीच ही चर्चा वायफळ ठरविली आहे.

नाशिक : संपर्क साधनांचे अनेक आधुनिक पर्याय उपलब्ध असल्याने टपालाच्या माध्यमातून दिवाळीचे शुभेच्छा संदेश पाठविणे कालबाह्य झाल्याची चर्चा होत असताना आधुनिक साधनांचा वापर करणाºयांनीच ही चर्चा वायफळ ठरविली आहे. यावर्षी टपाल खात्याच्या माध्यमातून सुमारे ५५ हजारापेक्षा अधिक भेटकार्डे एकमेकांना पाठविण्यात आली आहेत. यामध्ये छापील भेटकार्डाबरोबरच पोस्ट कार्डावरील मजकूर आणि हाताने रेखाटलेल्या चित्रांचा समावेश असलेल्या भेटकार्डांचा समावेश अधिक होता.आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि या साधनांचा वापर करून संपर्कात रहाणे ‘स्टेटस’ मानले जात असताना भेटकार्डाच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा पाठविणाºयांची संख्याही कमी नसल्याचे समोर आले आहे. आजकाल कोणताही सण, सोहळा आणि उत्सवात एकमेकांना शुभेच्छा पाठविण्याची क्रेझ आहे. एका क्लिकवर सारे काही होत असल्याने काही क्षणातील ही देवाण-घेवाण संख्यात्मक पातळी गाठते. परंतु ती मनाला भिडतेच याबाबत शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. किंबहुना अशा शुभेच्छांचा संचय करणे शक्य होईलच किंवा त्या मांडून ठेवणेही शक्य नसल्याने आकर्षक रंगसंगती, चित्र, देखावा आणि संदेशाच्या अर्थपूर्ण ओळी असलेली भेटकार्डे अनेकांना भावली आहेत. त्यामुळेच यंदा भेटकार्ड पाठविणाºयांची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. नाशिक टपाल कार्यालयातून यावर्षी दिवाळीचे शुभेच्छा संदेश पाठविण्यासाठीची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यास नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, ५५ हजारापेक्षा जास्त भेटकार्डे नातेवाइकांना एकमेकांना पाठविली आहेत. यामध्ये तयार भेटकार्डांबरोबरच हाताने लिहिलेले शुभेच्छा संदेशांचे पोस्टकार्ड आणि आंतरदेशीपत्रांचाही समावेश होता. वरवर टपाल खात्याकडे नागरिकांनी पाठ फिरविली असल्याचे बोलले जात असताना शुभेच्छा संदेश पाठविण्यासाठी टपाल खात्यासमोर गर्दी झाल्याने टपाल खात्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.