शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

‘भेटकार्ड’पुढे एसएमएस पडले फिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:53 IST

संपर्क साधनांचे अनेक आधुनिक पर्याय उपलब्ध असल्याने टपालाच्या माध्यमातून दिवाळीचे शुभेच्छा संदेश पाठविणे कालबाह्य झाल्याची चर्चा होत असताना आधुनिक साधनांचा वापर करणाºयांनीच ही चर्चा वायफळ ठरविली आहे.

नाशिक : संपर्क साधनांचे अनेक आधुनिक पर्याय उपलब्ध असल्याने टपालाच्या माध्यमातून दिवाळीचे शुभेच्छा संदेश पाठविणे कालबाह्य झाल्याची चर्चा होत असताना आधुनिक साधनांचा वापर करणाºयांनीच ही चर्चा वायफळ ठरविली आहे. यावर्षी टपाल खात्याच्या माध्यमातून सुमारे ५५ हजारापेक्षा अधिक भेटकार्डे एकमेकांना पाठविण्यात आली आहेत. यामध्ये छापील भेटकार्डाबरोबरच पोस्ट कार्डावरील मजकूर आणि हाताने रेखाटलेल्या चित्रांचा समावेश असलेल्या भेटकार्डांचा समावेश अधिक होता.आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि या साधनांचा वापर करून संपर्कात रहाणे ‘स्टेटस’ मानले जात असताना भेटकार्डाच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा पाठविणाºयांची संख्याही कमी नसल्याचे समोर आले आहे. आजकाल कोणताही सण, सोहळा आणि उत्सवात एकमेकांना शुभेच्छा पाठविण्याची क्रेझ आहे. एका क्लिकवर सारे काही होत असल्याने काही क्षणातील ही देवाण-घेवाण संख्यात्मक पातळी गाठते. परंतु ती मनाला भिडतेच याबाबत शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. किंबहुना अशा शुभेच्छांचा संचय करणे शक्य होईलच किंवा त्या मांडून ठेवणेही शक्य नसल्याने आकर्षक रंगसंगती, चित्र, देखावा आणि संदेशाच्या अर्थपूर्ण ओळी असलेली भेटकार्डे अनेकांना भावली आहेत. त्यामुळेच यंदा भेटकार्ड पाठविणाºयांची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. नाशिक टपाल कार्यालयातून यावर्षी दिवाळीचे शुभेच्छा संदेश पाठविण्यासाठीची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यास नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, ५५ हजारापेक्षा जास्त भेटकार्डे नातेवाइकांना एकमेकांना पाठविली आहेत. यामध्ये तयार भेटकार्डांबरोबरच हाताने लिहिलेले शुभेच्छा संदेशांचे पोस्टकार्ड आणि आंतरदेशीपत्रांचाही समावेश होता. वरवर टपाल खात्याकडे नागरिकांनी पाठ फिरविली असल्याचे बोलले जात असताना शुभेच्छा संदेश पाठविण्यासाठी टपाल खात्यासमोर गर्दी झाल्याने टपाल खात्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.