शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

स्त्रियांच्याच नव्हे, तर संपूर्ण मराठी साहित्यात ‘स्मृतिचित्रे’ला मोलाचे स्थान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST

नाशिक : लक्ष्मीबाई टिळक या आत्मचरित्र लिहिणाऱ्या मराठीतील पहिल्या लेखिका आहेत. ‘स्मृतिचित्रे’ या त्यांच्या आत्मचरित्राला केवळ स्त्रियांच्याच नव्हे, तर ...

नाशिक : लक्ष्मीबाई टिळक या आत्मचरित्र लिहिणाऱ्या मराठीतील पहिल्या लेखिका आहेत. ‘स्मृतिचित्रे’ या त्यांच्या आत्मचरित्राला केवळ स्त्रियांच्याच नव्हे, तर एकूण मराठी साहित्यात मोलाचे स्थान असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक एकनाथ पगार यांनी नमूद केले.

सावानाच्या वतीने आयोजित शब्दजागरमध्ये लक्ष्मीबाई टिळक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘स्मृतिचित्रे’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पारंपरिक रीतिरिवाजात वाढलेल्या लक्ष्मीबाई यांचे माहेरचे नाव मनकर्णिका गोखले होते. त्यांचे लग्न त्यांच्या वयाच्या अकराव्या वर्षी नारायण वामन टिळक यांच्याशी झाले. लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई टिळक असे झाले. घरातील रूढी, परंपरा, चालीरीतींचा पगडा लक्ष्मीबाईंवर बालपणापासूनच होता. त्यामुळे त्या जास्त शिक्षण घेऊ शकल्या नाहीत. लग्न झाल्यावर नारायण टिळकांनी त्यांना जमेल त्या वेळेत स्वत: शिक्षण दिले. ‘स्मृतिचित्रे’ या त्यांच्या गाजलेल्या आत्मचरित्रात त्यांनी या त्यांच्यावर झालेल्या ख्रिश्चन प्रभावाचे वर्णन केले आहे. नारायणराव टिळक हे सदसद्विवेकी बुद्धिवादी आणि चिकित्सक व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा प्रभाव लक्ष्मीबाई टिळक यांच्यावर लवकरच पडला. ‘स्मृतिचित्रे’ या आत्मकथनातून लक्ष्मीबाई टिळक यांनी तत्कालीन सामाजिक व्यवस्थेचे चित्रण केले आहे. त्यांचे पती रेव्ह. ना.वा. टिळक व त्या स्वत: ख्रिस्ती कशा झाल्या याचे वर्णन या पुस्तकात त्यांनी केले आहे. त्यांच्या या आत्मचरित्रात, जातीव्यवस्था, धार्मिक विद्वेष, विचारस्वातंत्र्यावर असलेली बंधने, यांचे वर्णन आले आहे. ८ जुलै, १९०० रोजी लक्ष्मीबाईंचा ख्रिस्ती धर्मात प्रवेश झाला. त्याशिवायही त्यांनी वैविध्यपूर्ण लेखन केले. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक वस्तुसंग्रहालय बी.जी. वाघ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सहायक सचिव डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी करून दिला. श्रीकांत बेणी यांनी आभार मानले.

इन्फो

महाराष्ट्र सरकारतर्फे लक्ष्मीबाई टिळक यांच्या नावाचा पुरस्कार एखाद्या आत्मकथनात्मक पुस्तकाला किंवा आत्मचरित्राला दिला जातो. माणसा-माणसांत भेदभाव करण्याची दुष्ट प्रवृत्ती मनातून समूळ नाहीशी होणं हे खरं धर्मांतर. त्यानंतर, तुम्ही कोणत्या लौकिक धर्माचा स्वीकार करता ते गौण आहे. जाती-धर्माची नव्हे, तर देवाची लेकरं व्हा, हेच स्मृतिचित्रेचे सार असल्याचे पगार यांनी नमूद केले.