शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

‘स्मार्ट सिटी’ संदिग्ध ठेवण्यामागे शासनाची चतुराई

By admin | Updated: November 20, 2015 23:59 IST

गाडगीळ : दाभोलकर व्याख्यानमालेत प्रतिपादन

नाशिक : स्मार्ट सिटी ही नव मध्यमवर्गीयांसाठी नवीन शहरे उभारण्याची योजना असली तरी मुळातच ही कल्पना अद्याप संदिग्ध आहे. त्यामुळे स्पर्धात्मक शहर ही पाश्चात्य कल्पना राबवून त्याचा लोकसहभाग घेतला जात असला तरी लोकांनाही ही कल्पना कळू नये आणि भागीदार कंपन्या किंवा देश म्हणतील त्या पद्धतीने योजना वाकवता यावी यासाठी शासनाने चतुराईने ही योजना संदिग्ध ठेवण्यात यश मिळवले असल्याचे प्रतिपादन पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते रणजित गाडगीळ यांनी केले.डॉ. नरेंद्र दाभोलकर व्याख्यानमालेत २३ वे पुष्प रणजित गाडगीळ यांनी स्मार्ट सिटी आणि लोकसहभाग या विषयावर गुंफले. लोकांचा सहभाग हा यंत्रणांच्या मूल्यमापनासाठी घेतला जात असेल तरी त्यातून फार कोणते बदल आपल्याकडे होतील याची शाश्वती नाही, त्यामुळे स्मार्ट सिटीला विरोध करावा किंवा सकारात्मकदृष्टीने सामोरे जावे हा वेगवेगळ्या विचारसरणीचा भाग असला तरी संघटनांच्या जागरुकतेमुळे यातील गैरलागू व्यवस्था अंमलात येऊ शकत नाही, हे नेहरू नागरी अभियानाच्या हवाल्यावरून त्यांनी स्पष्ट केले.स्मार्ट सिटी ही नेहरू नागरी अभियानाच्या धर्तीवरील एक योजना आहे. भाजपा सरकारने सार्वत्रिक निवडणुकीत शंभर नवी शहरे वसविण्याचे सर्वप्रथम जाहीर केले आणि त्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पहिल्या अंदाजपत्रकात स्मार्ट सिटीचा उल्लेख केला. स्मार्ट सिटी म्हणजे काय हे जानेवारी महिन्यात शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आणि नंतर हा मजकूर हटविण्यात आला. त्यामुळे आज नाशिक पुण्यासह सर्वत्र स्मार्ट सिटीचा गजर चालला असला तरी ते नक्की काय आहे, हे कृष्णधवल कागदावर स्पष्ट नाही असे सांगून ते म्हणाले की, नव्या मध्यमवर्गीयांना सध्याचे बकालपण नको असल्याने त्यांच्यासाठी नवीन शहर वसवणे आणि स्मार्ट म्हटले म्हणजे त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे हे ओघानेच आले. त्यासाठी थेट परकीय गुंतवणूक येणार आहे. शहरे स्मार्ट करून गुंतवणूक योग्य बनविणे ही अमेरिकन पद्धती आहे. मात्र, त्यातून सुविधांना तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी मानसिकता बदलू शकते काय असा प्रश्न त्यांनी केला. लोकसहभागाचा सध्या बोलबाला असला तरी सेवेचे मूल्यांकन करून ती यंत्रणा बदलणारच नसेल तर काय उपयोग असा प्रश्न त्यांनी केला. प्रारंभी प्रा. मिलिंद वाघ यांनी त्यांचा परिचय करून दिला. लोकनिर्माणचे संतोष जाधव यांनी त्यांचा स्वागतपर सत्कार केला. सचिन मालेगावकर यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)