शहरं
Join us  
Trending Stories
1
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
2
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
3
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
4
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
5
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
8
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
9
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
10
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
11
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
12
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
13
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
14
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
16
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
17
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
18
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
19
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
20
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

पालिका साधणार ‘स्मार्ट संवाद’

By admin | Updated: October 31, 2015 23:24 IST

सूचना संकलन मोहीम : ‘स्मार्ट सिटी’च्या आराखड्यासाठी नागरिकांची हवी साथ

नाशिक : केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात नाशिकचा समावेश करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी म्हणून विकसित करावयाच्या वीस शहरांमध्ये नाशिकचा समावेश व्हावा, यासाठी पालिका प्रशासनाकडून येत्या २ तारखेपासून जनसहभाग वाढविला जाणार आहे. यासाठी जनसामन्यांच्या सूचनांचे ‘स्मार्ट’ संकलन करण्याची मोहीम सुरू केली जाणार आहे.महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून शहरात ठिकठिकाणी जाऊन नागरिकांशी ‘स्मार्ट संवाद’ साधण्यावर भर देणार आहे. स्मार्ट सिटीबाबत नागरिकांची मते व सूचना जाणून घेण्यात येणार असून, शासनाला सादर करावयाचा आराखडा तयार करताना या सर्व सूचना विचारात घेण्यात येणार आहे. नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पालिकेला डिलिव्हरिंग चेंज फाउण्डेशन (डीसीएफ) या संस्थेचे सहकार्य लाभत आहे. यामाध्यमातून शहरात सर्वत्र स्मार्ट सिटीबाबत जनजागृती केली जात आहे. याबरोबरच नागरिकांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे.सोमवारपासून (दि.२०) शहराच्या सर्व विभागांमध्ये स्मार्ट सूचनांचे संकलन करण्यात येणार आहे. याअंतर्गत प्रत्येक स्तरावर नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. सकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये शहरातील सर्व जॉगिंग ट्रॅकवर जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे. दरम्यान, स्मार्ट नाशिक योजनेची माहिती देऊन नागरिकांकडून विहित नमुना माहिती अर्ज भरून घेतले जाणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा असा उपक्रम असून, नगरसेवकांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी या मोहिमेत योगदान देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)प्रचार-प्रसार : विद्यार्थ्यांचे ‘स्मार्ट मॉर्निंग वॉक’

‘स्मार्ट सिटी’ची योजना घराघरांमध्ये पोहचली जावी आणि त्याबाबतचा प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी पालिके च्या सर्व शाळांमधील विद्यार्थी सकाळी आठ वाजता परिसरात ‘स्मार्ट मॉर्निंग वॉक’ करणार आहेत. या ‘स्मार्ट प्रचार फेरी’दरम्यान परिसरातील नागरिकांकडून शिक्षक अर्ज भरून घेणार आहेत. तसेच शहरातील हौशी सायकलपटूंचाही फेरीमध्ये सहभाग राहणार आहे.या घटकांनुसार हव्या सूचना

‘स्मार्ट सिटी’ योजनेत निवडीसाठी पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, गोरगरिबांना घरकुले, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, डिजीटलायजेशन, आयटी, ई-तंत्रज्ञानाचा वापर आणि लोकसहभाग, पर्यावरण समतोल, महिला, मुले, ज्येष्ठांची सुरक्षितता, आरोग्य-शिक्षण आदि घटकांचा समावेश आहे.