शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीत स्मार्ट नाशिकला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:12 IST

महाराष्ट्र उद्योगासाठी प्रथम पसंतीचे शहर मानले जाते. कोरोना काळातही राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली असून देशातील २४ उद्योग समूहांनी ...

महाराष्ट्र उद्योगासाठी प्रथम पसंतीचे शहर मानले जाते. कोरोना काळातही राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली असून देशातील २४ उद्योग समूहांनी महाराष्ट्रात हजारो कोटी रुपयांची गुंतवणुकीसाठी करार केले आहेत. यात कोकणात ४७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून अन्य ठिकाणी गुंतवणूक करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात अगदी भुसावळ आणि नरडाण्याला अनेक उद्योग सुरू करण्यासाठी करार झाले आहेत. मात्र, नाशिक जिल्ह्यात एकही नवीन उद्योग येण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाल्याने उद्येाग क्षेत्राला धक्का बसला आहे.

मुंबई- पुणे या सुवर्ण त्रिकोणात नाशिक जिल्हा असून सातपूर, अंबड ही मोठी औद्योगिक वसाहत आहे. सिन्नरला तर उद्योगांबरोबरच सेझ देखील आहे. तसेच वाईन पार्क आणि फूड पार्क बरोबरच मालेगाव तर टेक्स्टाईल पार्क देखील आहे. नाशिक शहरात उद्योग क्षेत्रासाठी जागा नसली तरी दिंडोरी तालुक्यात आक्राळे येथे नवीन औद्याेगिक वसाहत तयार होऊन पडली आहे. याशिवाय आग्रारोडवर इगतपुरी, गोंदे, वाडीवऱ्हे अशा अनेक ठिकाणी उद्याेग सुरू आहेत. नाशिकला दळणवळणाची साधने तर आहेतच परंतु विमान सेवाही सध्या फार्मात आहे. अशा सर्व प्रकारच्या पोषक वातावरणानंतर देखील मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये एकही प्रकल्प येण्यास तयार नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिकमध्ये मोठ्या उद्योगांवर आधारित लहान व्हेंडर्स मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना नवीन उद्योगाची आस आहे. विशेषत: कोरोना काळात अर्थकारण डळमळीत झाल्याने नवीन उद्येागांची अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र निराशा पदरी पडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोट..

केवळ कोट्यवधी रुपयांचे करार करून उपयोग नाही. ते उद्योग आले पाहिजेत. एकूणच उद्योगांकडे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वी मेक इन नाशिक उपक्रम मुंबईत राबवण्यात आला, परंतु त्यावेळी ज्यांनी स्वारस्य दाखवले, त्यांना देखील नाशिकमध्ये जागा मिळाली नाही, मग उद्योग कसे येणार? नाशिकमध्ये लघु उद्याेग मोठ्या प्रमाणात असून त्यांना कोराेना काळातील अडचणीनंतर दिलासाही मिळालेला नाही.

- संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स ॲँड इंडस्ट्री

इन्फो...

मेक इन काहीच नाही...

मेक इन महाराष्ट्र आणि त्यानंतर मेक इन नाशिक हा मुंबईत निमाच्या पुढाकाराने राबवलेल्या उपक्रमात देखील आता खूप गुंतवणूक येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात काहीच झाले नाही. इंजिनिअरिंग क्लस्टर, इलेक्ट्रिक क्लस्टर, डिफेन्स इनोव्हेशन हब असे शब्द कागदावरच राहिले आहेत.