शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी कंपनीने नाशिककरांची निराशा केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:11 IST

नाशिक : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून दाखविण्यात आलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या नावाखाली स्मार्ट सिटी कंपनीने मनमानी पद्धतीने काम करीत नाशिककरांची ...

नाशिक : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून दाखविण्यात आलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या नावाखाली स्मार्ट सिटी कंपनीने मनमानी पद्धतीने काम करीत नाशिककरांची निराशा केली. परंतु महापालिकेसह, राज्य शासन अथवा अन्य कोणत्याही यंत्रणेने त्यावर कोणतीही भूमिका न घेता कानाडोळा केल्याची खंत नाशिकमधील विविध क्षेत्रातील ज्येष्ठांनी व्यक्त केली.

‘लोकमत’ नाशिक आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त शहरातील ज्येष्ठ आर्किटेक्चर, शिक्षण व ग्राहक चळवळ, तसेच कृषी अर्थशास्त्र व चळवळीतील ज्येष्ठ व्यक्तींशी संवाद साधण्यात आला. यावेळी आर्किटेक्ट अरुण काबरा यांनी स्मार्टच्या माध्यमातून झालेल्या कामांविषयी तीव्र नाराजी व्यक्त करताना स्मार्ट सिटी कंपनीने नाशिकचे वाटोळे केल्याचे मत व्यक्त केले. शहरातील सर्वात चांगला डांबरीकरणाचा रस्ता स्मार्ट रोडच्या नावाखाली खोदून काम करण्यासाठी नियोजित वेळेच्या तिप्पटहून अधिक वेळ घेऊनही केवळ काँक्रिटीकरणच केले. सायकलसाठी तयार केलेल्या ट्रॅकवर एक सायकलही चालू शकेल की नाही, अशी अवस्था आहे. गोदावरीतून गाळ काढण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवूनही महापालिका, राज्य शासन अथवा प्रशासनातील कोणत्याही यंत्रणेने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. दिलीप फडके यांनीही स्मार्ट रोडच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली. स्मार्ट रोड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पातळीपेक्षा चार फुटांनी उंच असल्याचे नमूद असून नाशिकला होणाऱ्या पावसाची तीव्रता लक्षात घेता पावसाने जिल्हाधिकारी कार्यालयाचा तळमजलाच पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली असल्याचे त्यांनी अधोरेखित करतानाच यंत्रणेच्या निष्क्रियतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मु्ख्य बाजारपेठेतील रस्ता खोदून ठेवण्यात काय नियोजन आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर हीच परिस्थिती कृषी क्षेत्रात असल्याचे मत कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक तथा शेतकरी चळवळीचे नेते डॉ. गिरीधर पाटील यांनी व्यक्त केले. राजकारणी, बाजार समिती आणि व्यापारी असे सर्वच घटक शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे नमूद करतानाच आताच्या आंदोलनाने राजकीय रसदीवर होत असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे राहत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, ब्रह्मगिरी उत्खनन प्रकरणातही शासन व प्रशासकीय यंत्रणेकडून गांभीर्यपूर्वक कार्यवाही होत नसल्याकडेही या ज्येष्ठांनी लक्ष वेधले.

व्यासंग, साधना संपुष्टात येत आहे

नाशिक शहराला कला,साहित्य शिक्षणाचा मोठा वारसा आहे. परंतु, या क्षेत्रात नव्या निर्मितीसाठी आवश्यक असलेला व्यासंग, साधना दिवसेंदिवस आता उरली नाही. नव्या पिढीच्या हातात गुगल सारखे तंत्रज्ञान आल्याने अभ्यासाची तयारीच राहिलेली नाही. भाषे विचारणारेही राहिले नाहीत. त्यामुळे सर्वच बाबतीतील उथळपणा वाढला असल्याचे मत यावेळी प्रा. दिलीप फडके यांनी व्यक्त केले.

म्हणून शेतीत गुंतवणूक वाढेल

खासगी बाजारपेठा कोरोना संकटामुळे जगभरातील व्यवसाय ठप्प असताना भविष्यात शेती क्षेत्रच शास्वत असल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे पुढील काळात शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढणार असून मोठे भांडवलदार आता शेती क्षेत्र काबीज करण्याच्या प्रयत्नात असल्याचे भाकित डॉ.गिरीधर पाटील यांनी व्यक्त केले.

===Photopath===

220621\225922nsk_40_22062021_13.jpg

===Caption===

वर्धापन दिन संवाद